शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पुरातन तुकाई लेणी नष्ट होण्याच्या मार्गावर; पावसाचे पाणी साचल्याने धोका वाढला

By शिवाजी कदम | Updated: July 24, 2023 17:41 IST

केळना नदीच्या काठावर आलापूरच्या शिवारात तुकाई लेणीसह रामेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आहेत.

- फकिरा देशमुखभोकरदन: पुरातन वारसा स्थळांची निगा राखणे गरजेचे असते. परंतु, येथून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आलापूर शिवारातील तुकाई लेणी नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. लेणीत पाणी साचल्याने येथील मूर्ती जीर्ण झाल्या आहेत. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तुकाई लेणीत पावसाळ्यात चार महिने ३ ते ४ फूट पाणी साचत असल्याने येथील लेणीला धोका निर्माण झाला आहे. पाणी जाण्यास वाट नसल्याने मूर्ती जीर्ण होत आहेत. लेणीला गळती सुद्धा लागली असून दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे लेणीकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.

केळना नदीच्या काठावर आलापूरच्या शिवारात तुकाई लेणीसह रामेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आहेत. मात्र पर्यटकांना ही लेणी पाहणे जिकिरीचे बनले आहे. लेणीमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने येथे जाणे अशक्य झाले आहे. यामुळे पर्यटकांना आत जाऊन लेणी पाहता येत नाही. शिवाय लहान मुलांनाही लेणी पाहणे धोकादायक झाले आहे.

विद्यापीठाकडून उत्खनन१९३५ मध्ये येथील लेणी प्रकाशझोतात आली. १९७३ मध्ये तत्कालीन मराठवाडा आणि नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी येथे उत्खनन केले होते. या लेण्या दुहेरी मंडपात आहेत. बाहेरच्या बाजूला शिव आणि पार्वतीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या मूर्तींच्या शैलीवरून त्या राष्ट्रकुलाच्या काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी येथे थांबले असल्याची आख्यायिका आहे. लेणीच्या जवळच केळना नदीच्या काठावर रामेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. येथे महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते.

एका कर्मचाऱ्याची नियुक्तीपुरातत्त्व खात्याने येथे एका पहारेकरी कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. मात्र, तो कर्मचारी नियमित येथे हजर राहत नाही. लेणीतील पाणी उपसा करून जीर्ण होत असलेल्या मूर्ती व लेणीचा बचाव करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. परतीच्या पावसामुळे केळना नदीला मोठा महापूर आला होता. सद्य:स्थितीतही नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सुरू आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाणी झिरपून या लेणीमध्ये येत आहे. पाणी बाहेर काढता येत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून या लेणीतील मूर्ती पाण्यात आहेत.

दुरुस्तीसाठी परवानगी मागितली केळना नदीला पूर असल्यास पाणी लेणीच्यामध्ये येते. जोपर्यंत नदीचे पात्र वाहत असते तोपर्यंत लेणीत पाणी झिरपते. त्यामुळे मूर्ती जीर्ण होत आहेत. लेणीची गळती थांबविण्यासाठी वरिष्ठांना पत्र दिले आहे. दुरुस्तीसाठी निधीला मंजुरी मिळालेली नाही.- सुरेश इंगळे, पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी

टॅग्स :JalanaजालनाArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण