शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

मोदींकडून विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:11 IST

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी संपर्क साधला, यावेळी त्यांची आणि माझी अहमदाबादमध्ये चर्चा झाली. तत्कालीन काँग्रेसचे सरकार हे भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी असल्याच्या मुद्यावरून त्या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे मी शेतकरी हितासाठी त्यांच्या सोबत गेलो, मात्र, त्यांनी विश्वासघात केला. हाच कित्ता खा.राहुल गांधी करतील तर त्यांचीही साथ लगेच सोडू असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी संपर्क साधला, यावेळी त्यांची आणि माझी अहमदाबादमध्ये चर्चा झाली. तत्कालीन काँग्रेसचे सरकार हे भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी असल्याच्या मुद्यावरून त्या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे मी शेतकरी हितासाठी त्यांच्या सोबत गेलो, मात्र, त्यांनी विश्वासघात केला. हाच कित्ता खा.राहुल गांधी करतील तर त्यांचीही साथ लगेच सोडू असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.शेतकरी सन्मान यात्रेनिमित्त खा. राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे शनिवारी जालन्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आज केंद्र व राज्य सरकार हे केवळ घोषणा करणारे सरकार आहे. स्वातंत्र्यानंतर आपण पहिल्यांदाच एवढी चांगली सुश्राव्य भाषणबाजी ऐकल्याचे सांगून, शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी हे लोकशाहीला मानणारे नेते म्हणून सर्वत्र मिरवत असतात, आता त्यांच्यातील खरेपणा तेव्हाच सिध्द होईल, ज्यावेळी ते मे महिन्याच्या शेवटी देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक आठवड्याचे संसदेचे अधिवेशन भरवतील. या प्रमुख मागणीसाठी १० मे रोजी देशातील सर्व जिल्हाधिकाºयांना स्वाक्षºयांचे निवेदन देण्यात येऊन ही देशाची मागणी असल्याचे दर्शविण्यात येणार आहे.यावेळी त्यांनी दुधाचे भाव घरण्यामागे केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. आपण तीन महिन्यांपूर्वी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याची पूर्वसचूना दिली होती, मात्र, त्याकडे गंभीरतेने घेतले नसल्यानेच आज क्षमतेपेक्षा जास्त दुधाचे उत्पादन झाल्याचे ते म्हणाले. तसेच कमी दर देणा-या दूध संघावर कारवाई करणार असे सरकार सांगत असले तरी, तसा कुठलाच कायदा नसल्याने ही एक प्रकारची धूळफेक असल्याचे शेट्टी म्हणाले. नोटाबंदी, जीएसटीमुळै शेतक-यांचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. बँकाकडून शेतक-यांना कृषीकर्ज देण्यातही टोलवा-टोलवी केली जात आहे. गेल्यावर्षी ४२ हजार कोटी रूपयांचे कृषीकर्ज दिले होते, ते यंदा केवळ २२ हजार कोटी रूपयेच वाटप झाल्याचे सांगण्यात आले.संसदेचे अधिवेशन बोलावण्यास पंतप्रधान मोदी यांना शेतकरी भाग पाडतील, त्या अधिवेशनात शेतक-यांच्या उत्पादनाला दीडपट हमी भाव आणि कर्जमुक्ती हे दोन विधेयके मांडणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी रविकांत तुपकर, साईनाथ चिन्नादोरे, सुरेश गवळी यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती.शेतक-यांच्या हितासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आपण जोडले गेलो. मात्र ज्यावेळी शेतक-यांना दीडपट हमीभाव देण्याच्या मुद्यावरून जे घुमजाव केले त्यावेळपासून आपण त्यांच्या विरोधता थेट भूमिका घेतली. एकूणच भविष्यात काँग्रेसचे सरकार आले आणि या पक्षानेही अशीच भूमिका घेतल्यास राहुल गांधीची साथ सोडून देऊन शेतकºयां सोबत राहणार असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.टोपे, गोरंट्याल भेटस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी हे जालन्यातील विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राजेश टोपे, जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्यासह माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारण