शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

मोदींकडून विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:11 IST

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी संपर्क साधला, यावेळी त्यांची आणि माझी अहमदाबादमध्ये चर्चा झाली. तत्कालीन काँग्रेसचे सरकार हे भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी असल्याच्या मुद्यावरून त्या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे मी शेतकरी हितासाठी त्यांच्या सोबत गेलो, मात्र, त्यांनी विश्वासघात केला. हाच कित्ता खा.राहुल गांधी करतील तर त्यांचीही साथ लगेच सोडू असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी संपर्क साधला, यावेळी त्यांची आणि माझी अहमदाबादमध्ये चर्चा झाली. तत्कालीन काँग्रेसचे सरकार हे भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी असल्याच्या मुद्यावरून त्या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे मी शेतकरी हितासाठी त्यांच्या सोबत गेलो, मात्र, त्यांनी विश्वासघात केला. हाच कित्ता खा.राहुल गांधी करतील तर त्यांचीही साथ लगेच सोडू असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.शेतकरी सन्मान यात्रेनिमित्त खा. राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे शनिवारी जालन्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आज केंद्र व राज्य सरकार हे केवळ घोषणा करणारे सरकार आहे. स्वातंत्र्यानंतर आपण पहिल्यांदाच एवढी चांगली सुश्राव्य भाषणबाजी ऐकल्याचे सांगून, शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी हे लोकशाहीला मानणारे नेते म्हणून सर्वत्र मिरवत असतात, आता त्यांच्यातील खरेपणा तेव्हाच सिध्द होईल, ज्यावेळी ते मे महिन्याच्या शेवटी देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक आठवड्याचे संसदेचे अधिवेशन भरवतील. या प्रमुख मागणीसाठी १० मे रोजी देशातील सर्व जिल्हाधिकाºयांना स्वाक्षºयांचे निवेदन देण्यात येऊन ही देशाची मागणी असल्याचे दर्शविण्यात येणार आहे.यावेळी त्यांनी दुधाचे भाव घरण्यामागे केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. आपण तीन महिन्यांपूर्वी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याची पूर्वसचूना दिली होती, मात्र, त्याकडे गंभीरतेने घेतले नसल्यानेच आज क्षमतेपेक्षा जास्त दुधाचे उत्पादन झाल्याचे ते म्हणाले. तसेच कमी दर देणा-या दूध संघावर कारवाई करणार असे सरकार सांगत असले तरी, तसा कुठलाच कायदा नसल्याने ही एक प्रकारची धूळफेक असल्याचे शेट्टी म्हणाले. नोटाबंदी, जीएसटीमुळै शेतक-यांचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. बँकाकडून शेतक-यांना कृषीकर्ज देण्यातही टोलवा-टोलवी केली जात आहे. गेल्यावर्षी ४२ हजार कोटी रूपयांचे कृषीकर्ज दिले होते, ते यंदा केवळ २२ हजार कोटी रूपयेच वाटप झाल्याचे सांगण्यात आले.संसदेचे अधिवेशन बोलावण्यास पंतप्रधान मोदी यांना शेतकरी भाग पाडतील, त्या अधिवेशनात शेतक-यांच्या उत्पादनाला दीडपट हमी भाव आणि कर्जमुक्ती हे दोन विधेयके मांडणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी रविकांत तुपकर, साईनाथ चिन्नादोरे, सुरेश गवळी यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती.शेतक-यांच्या हितासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आपण जोडले गेलो. मात्र ज्यावेळी शेतक-यांना दीडपट हमीभाव देण्याच्या मुद्यावरून जे घुमजाव केले त्यावेळपासून आपण त्यांच्या विरोधता थेट भूमिका घेतली. एकूणच भविष्यात काँग्रेसचे सरकार आले आणि या पक्षानेही अशीच भूमिका घेतल्यास राहुल गांधीची साथ सोडून देऊन शेतकºयां सोबत राहणार असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.टोपे, गोरंट्याल भेटस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी हे जालन्यातील विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राजेश टोपे, जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्यासह माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारण