शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

पाणीटंचाई निवारणार्थ हयगय नको- खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:39 IST

गावांचा संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा सरपंचाना विश्वासात घेऊन तयार करावा, तसेच जिल्हा प्रशासनाने आराखड्यास चार दिवसांत प्रशासकीय मान्यता द्वावी, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील गावांचा संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा सरपंचाना विश्वासात घेऊन तयार करावा, तसेच जिल्हा प्रशासनाने आराखड्यास चार दिवसांत प्रशासकीय मान्यता द्वावी, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले. पाणीटंचाई निवारणार्थ कामात हयगय करणाऱ्या कर्मचा-यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी उपविभागीय अधिका-यांना दिल्या.जिल्हा परिषदेच्या सभागृहात शनिवारी राज्यमंत्री खोतकर यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती पांडुरंग डोंगरे, भानुदास घुगे, जि.प. सदस्य रऊफ, जयप्रकाश चव्हाण, कैलास चव्हाण, भाऊसाहेब घुगे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार विपीन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. संभाव्य पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी मागणी येईल तिथे टँकर उपलब्ध करून द्यावे, खाजगी विहिरींचे अधिग्रहण, नळ योजना दुरुस्तीबरोबरच रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.पाणीपुरवठा विस्कळित होऊ नये यासाठी वीज जोडण्या खंडित करू नये, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले. कायमस्वरुपी पाणीटंचाई निवारणार्थ काय उपाय योजना करता येईल, याचा लेखी प्रस्ताव देण्याच्या सूचना सरंपचांना केल्या. अधिकारी ऐकत नाहीत, अशा तक्रारी सरपंचांनी सभागृहात केल्या. पाणीटंचाई निवारणार्थ प्रत्येक महिन्याला स्वत: बैठक घेऊ, असे आश्वासन खोतकर यांनी सरपंचांना दिले.मोजपुरी येथील सरपंचांनी गावात टंचाई निवारणार्थ सर्व प्रस्ताव देऊनही अधिकारी काहीच करत नसल्याचे गा-हाणे मांडले. प्रस्तावाशी संबंधित अधिका-यांनी एकमेकांची नावे घेत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यमंत्री खोतकर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना रावताळे यांच्यावर चांगलेच भडकले. इतर तालुक्यांचे दोन हजार सिंचन विहिरींचे प्रस्ताव झाले. जालना तालुक्यातील प्रस्तावांवर काहीच निर्णय नाही. पैसे शासन देणार आहे, तुम्ही नाही. प्रस्तावांवर निर्णय का होत नाही, याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी केशव नेटके व तहसीलदार विपिन पाटील यांनाही जाब विचारला.