शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पाणीटंचाई निवारणार्थ हयगय नको- खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:39 IST

गावांचा संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा सरपंचाना विश्वासात घेऊन तयार करावा, तसेच जिल्हा प्रशासनाने आराखड्यास चार दिवसांत प्रशासकीय मान्यता द्वावी, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील गावांचा संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा सरपंचाना विश्वासात घेऊन तयार करावा, तसेच जिल्हा प्रशासनाने आराखड्यास चार दिवसांत प्रशासकीय मान्यता द्वावी, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले. पाणीटंचाई निवारणार्थ कामात हयगय करणाऱ्या कर्मचा-यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी उपविभागीय अधिका-यांना दिल्या.जिल्हा परिषदेच्या सभागृहात शनिवारी राज्यमंत्री खोतकर यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती पांडुरंग डोंगरे, भानुदास घुगे, जि.प. सदस्य रऊफ, जयप्रकाश चव्हाण, कैलास चव्हाण, भाऊसाहेब घुगे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार विपीन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. संभाव्य पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी मागणी येईल तिथे टँकर उपलब्ध करून द्यावे, खाजगी विहिरींचे अधिग्रहण, नळ योजना दुरुस्तीबरोबरच रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.पाणीपुरवठा विस्कळित होऊ नये यासाठी वीज जोडण्या खंडित करू नये, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले. कायमस्वरुपी पाणीटंचाई निवारणार्थ काय उपाय योजना करता येईल, याचा लेखी प्रस्ताव देण्याच्या सूचना सरंपचांना केल्या. अधिकारी ऐकत नाहीत, अशा तक्रारी सरपंचांनी सभागृहात केल्या. पाणीटंचाई निवारणार्थ प्रत्येक महिन्याला स्वत: बैठक घेऊ, असे आश्वासन खोतकर यांनी सरपंचांना दिले.मोजपुरी येथील सरपंचांनी गावात टंचाई निवारणार्थ सर्व प्रस्ताव देऊनही अधिकारी काहीच करत नसल्याचे गा-हाणे मांडले. प्रस्तावाशी संबंधित अधिका-यांनी एकमेकांची नावे घेत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यमंत्री खोतकर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना रावताळे यांच्यावर चांगलेच भडकले. इतर तालुक्यांचे दोन हजार सिंचन विहिरींचे प्रस्ताव झाले. जालना तालुक्यातील प्रस्तावांवर काहीच निर्णय नाही. पैसे शासन देणार आहे, तुम्ही नाही. प्रस्तावांवर निर्णय का होत नाही, याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी केशव नेटके व तहसीलदार विपिन पाटील यांनाही जाब विचारला.