शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

परतूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. असे ...

परतूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही परतूर येथील जि. प. प्रशाळेच्या मैदानात शनिवारी आठवडी बाजार भरविण्यात आला होता. परंतु, ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात भाजीपाला विकण्याची वेळ आली.

परतूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. असे असतानाही परतूर येथील जि. प. प्रशाळेच्या मैदानावर आठवडी बाजार भरविण्यात आला होता, तर काही विक्रेत्यांनी आपली दुकाने मुख्य रस्त्यावर थाटली होती. परंतु, येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले. याकडे नगरपालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, आठवडी बाजारात ग्राहक नसल्याने कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागला. कोणत्याच भाजीपाल्यास भाव मिळत नसल्याने लागवड, काढणी व वाहतुकीचा खर्चही निघणे अ‌वघड झाले आहे.

टोमॅटोची पाच रुपये किलोने विक्री

मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत. टोमॅटो उत्पादक तर भाव नसल्याने हैराण झाले आहेत. टोमॅटोची केवळ पाच रुपये किलोने विक्री होत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत.