शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

परतूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. असे ...

परतूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही परतूर येथील जि. प. प्रशाळेच्या मैदानात शनिवारी आठवडी बाजार भरविण्यात आला होता. परंतु, ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात भाजीपाला विकण्याची वेळ आली.

परतूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. असे असतानाही परतूर येथील जि. प. प्रशाळेच्या मैदानावर आठवडी बाजार भरविण्यात आला होता, तर काही विक्रेत्यांनी आपली दुकाने मुख्य रस्त्यावर थाटली होती. परंतु, येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले. याकडे नगरपालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, आठवडी बाजारात ग्राहक नसल्याने कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागला. कोणत्याच भाजीपाल्यास भाव मिळत नसल्याने लागवड, काढणी व वाहतुकीचा खर्चही निघणे अ‌वघड झाले आहे.

टोमॅटोची पाच रुपये किलोने विक्री

मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत. टोमॅटो उत्पादक तर भाव नसल्याने हैराण झाले आहेत. टोमॅटोची केवळ पाच रुपये किलोने विक्री होत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत.