शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

परतूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. असे ...

परतूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही परतूर येथील जि. प. प्रशाळेच्या मैदानात शनिवारी आठवडी बाजार भरविण्यात आला होता. परंतु, ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात भाजीपाला विकण्याची वेळ आली.

परतूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. असे असतानाही परतूर येथील जि. प. प्रशाळेच्या मैदानावर आठवडी बाजार भरविण्यात आला होता, तर काही विक्रेत्यांनी आपली दुकाने मुख्य रस्त्यावर थाटली होती. परंतु, येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले. याकडे नगरपालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, आठवडी बाजारात ग्राहक नसल्याने कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागला. कोणत्याच भाजीपाल्यास भाव मिळत नसल्याने लागवड, काढणी व वाहतुकीचा खर्चही निघणे अ‌वघड झाले आहे.

टोमॅटोची पाच रुपये किलोने विक्री

मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत. टोमॅटो उत्पादक तर भाव नसल्याने हैराण झाले आहेत. टोमॅटोची केवळ पाच रुपये किलोने विक्री होत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत.