शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

दाभाडी- चिखली मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

रूग्णसंख्येत वाढ जालना : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापीसह इतर आजाराच्या ...

रूग्णसंख्येत वाढ

जालना : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापीसह इतर आजाराच्या रूग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. असे असले तरी अनेकजण अंगावर आजार काढत आहेत. नागरिकांनी तज्ज्ञांमार्फत उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्याची मागणी

जालना : राज्य परिवहन महामंडळाच्या जालना आगारातून अनेक लांब पल्ल्याच्या बसेस अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. या बसेस सुरू नसल्याने अनेकांना औरंगाबादेत जाऊन इतर शहरात प्रवास करावा लागत आहे. ही बाब पाहता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दुधपुरी परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अंबड : उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने पोकरा प्रकल्पांतर्गत दुधपुरी व परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतीशाळा समन्वयक डॉ. एस.एन. हरडे, प्रशिक्षक समीक्षा बनसोडे यांनी विविध विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसण केले. कार्यक्रमास कृष्णा काकडे, गणेश टापरे, संतोष पाचफुले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त

अंबड : गत काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील खरिपाची पिके बहरली आहेत. परंतु, या कोवळ्या पिकांवर हरणांचे कळप ताव मारत आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होत आहे.

पुलाचे बांधकाम रखडल्याने गैरसोय

अंबड : तालुक्यातील गोंदी- हादगाव मार्गावरील पुलांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे या पुलावरून वाहने चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. जोरदार पाऊस पडल्यानंतर येथे अपघाताचाही धोका निर्माण होत आहे. ही बाब पाहता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या मार्गावरील पुलांचे काम पूर्ण करावेत, अशी मागणी परिसरातील वाहन चालकांसह प्रवासी वर्गातून केली जात आहे.

ReplyForward