शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

कुपोषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:13 IST

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात केलेल्या तपासणीत ० ते ५ वयोगटातील १२८९ बालके कुपोषित आढळून आली आहेत.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासनामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहे. असे असले तरी ग्रामीण भागात कुपोषणाची समस्या अद्याप कायम आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात केलेल्या तपासणीत ० ते ५ वयोगटातील १२८९ बालके कुपोषित आढळून आली आहेत. यामध्ये तीव्र कुपोषित बालकांची संख्या २९९ इतकी आहे.कुपोषित बालकांच्या श्रेणी संवर्धनाची जबाबदारी महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभागाकडे आहे. जिल्ह्यातील कुपोषित मुलांचा शोध घेण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, आशा कार्यकर्त्यांमार्फत जिल्ह्यातील एक हजार ९५४ अंगणवाड्यांमध्ये ० ते पाच वयोगटातील एक लाख ३९ हजार २७७ बालकांची तपासणी करण्यात आली. बालकांचे वजन व उंची वयानुसार योग्य आहे का, त्यांच्या कमरेचा व दंडाचा घेर याचे मोजमाप करून कुपोषित व तीव्र कुपोषित, असे वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिका-यांमार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ९९० बालके मध्यम तर २९९ बालके गंभीर तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. अंबड, भोकरदन, जाफराबाद या तालुक्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे. आता या कुपोषित बालकांना सर्वसामान्य बालकांच्या श्रेणीत आणण्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून कुपोषित बालकांना १२ आठवडे विशेष पूरक आहाराचे वाटप केले जाणार आहे. आहार वाटप सुरू असताना प्रत्येक आठवड्याला बालकांचे वजन तपासले जाणार आहे. कमी वजनाची मुले सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत येत नाहीत, तोपर्यंत ग्राम केंद्र सुरू राहणार आहे. ज्या बालकांच्या वजनात वाढ होत नाही, अशांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यात मुलांना नेमका कोणता आजार आहे याचे निदान करण्यात येणार आहे.