शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

कुपोषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:13 IST

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात केलेल्या तपासणीत ० ते ५ वयोगटातील १२८९ बालके कुपोषित आढळून आली आहेत.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासनामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहे. असे असले तरी ग्रामीण भागात कुपोषणाची समस्या अद्याप कायम आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात केलेल्या तपासणीत ० ते ५ वयोगटातील १२८९ बालके कुपोषित आढळून आली आहेत. यामध्ये तीव्र कुपोषित बालकांची संख्या २९९ इतकी आहे.कुपोषित बालकांच्या श्रेणी संवर्धनाची जबाबदारी महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभागाकडे आहे. जिल्ह्यातील कुपोषित मुलांचा शोध घेण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, आशा कार्यकर्त्यांमार्फत जिल्ह्यातील एक हजार ९५४ अंगणवाड्यांमध्ये ० ते पाच वयोगटातील एक लाख ३९ हजार २७७ बालकांची तपासणी करण्यात आली. बालकांचे वजन व उंची वयानुसार योग्य आहे का, त्यांच्या कमरेचा व दंडाचा घेर याचे मोजमाप करून कुपोषित व तीव्र कुपोषित, असे वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिका-यांमार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ९९० बालके मध्यम तर २९९ बालके गंभीर तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. अंबड, भोकरदन, जाफराबाद या तालुक्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे. आता या कुपोषित बालकांना सर्वसामान्य बालकांच्या श्रेणीत आणण्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून कुपोषित बालकांना १२ आठवडे विशेष पूरक आहाराचे वाटप केले जाणार आहे. आहार वाटप सुरू असताना प्रत्येक आठवड्याला बालकांचे वजन तपासले जाणार आहे. कमी वजनाची मुले सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत येत नाहीत, तोपर्यंत ग्राम केंद्र सुरू राहणार आहे. ज्या बालकांच्या वजनात वाढ होत नाही, अशांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यात मुलांना नेमका कोणता आजार आहे याचे निदान करण्यात येणार आहे.