शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

शेषराव वायाळ परतूर : वयाचे कारण पुढे करीत अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बिघडलेल्या अर्थकारणामुळे ...

शेषराव वायाळ

परतूर : वयाचे कारण पुढे करीत अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बिघडलेल्या अर्थकारणामुळे शेतातील कामे करण्यासाठी या शेतकऱ्यांना आता सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे.

पीककर्ज देण्यासाठी बँका काहीही कारण पुढे करून हे कर्ज देणे कसे टाळता येईल, हेच पाहत आहेत. एकीकडे शासन वयोवृद्धांना विविध सवलती व सेवा उपलब्ध करून देत आहे. मात्र, राज्यातील प्रमुख राष्ट्रीयीकृत बँका जाचक नियम व अटी लादून वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीककर्जासह विविध कर्जांपासून वंचित ठेवत आहेत. कोणत्याही शेतकऱ्याने पीककर्ज घेतल्यास त्या कर्जाचा बोजा हा साताबारा उताऱ्यावर टाकण्यात येतो. एकदा सातबारा उताऱ्यावर बोजा आला की, ते कर्ज फेडणे बंधनकारच असते; अन्यथा जमिनीसंबंधी पुढील व्यवहार होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याच्या वयाचा प्रश्न येतो कुठे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. अगोदरच वयोवृद्ध शेतकऱ्यांचा आधार संपलेला आहे. निसर्गाचीही साथ मिळत नाही. दरवर्षी शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट उभे राहत आहे. यात आता बँकांच्या जाचक अटींमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे.

पीककर्जाचे अर्ज स्वीकारले

वयोवृद्ध शेतकऱ्यांनी पीककर्ज मागणीचे अर्ज रीतसर भरून बँकांना दिले आहेत. बँकांनी हे अर्ज स्वीकारलेही आहेत. मात्र, आता शेतकरी विचारपूस करीत असताना वयाचे कारण पुढे करीत कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

प्रकरणे मार्गी लावावीत

बँकांनी विविध कारणे पुढे करून वयोवृद्ध शेतकऱ्यांची गैरसोय करू नये. शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज वाटप करण्यात यावे. वयोवृद्ध शेतकऱ्यांची गैरसोय होत असेल, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड यांनी दिला.

कर्ज कोण भरणार?

पीककर्ज घेणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे निधन झाले, तर कर्ज वसुलीसाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे पीककर्ज देताना संबंधित शेतकऱ्याचे वय पाहिले जाते. कर्ज घेतले आणि त्यानंतर त्यांचे निधन झाले, तर पीककर्ज भरणार कोण? असे एका शाखा व्यवस्थापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.