शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

शेषराव वायाळ परतूर : वयाचे कारण पुढे करीत अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बिघडलेल्या अर्थकारणामुळे ...

शेषराव वायाळ

परतूर : वयाचे कारण पुढे करीत अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बिघडलेल्या अर्थकारणामुळे शेतातील कामे करण्यासाठी या शेतकऱ्यांना आता सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे.

पीककर्ज देण्यासाठी बँका काहीही कारण पुढे करून हे कर्ज देणे कसे टाळता येईल, हेच पाहत आहेत. एकीकडे शासन वयोवृद्धांना विविध सवलती व सेवा उपलब्ध करून देत आहे. मात्र, राज्यातील प्रमुख राष्ट्रीयीकृत बँका जाचक नियम व अटी लादून वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीककर्जासह विविध कर्जांपासून वंचित ठेवत आहेत. कोणत्याही शेतकऱ्याने पीककर्ज घेतल्यास त्या कर्जाचा बोजा हा साताबारा उताऱ्यावर टाकण्यात येतो. एकदा सातबारा उताऱ्यावर बोजा आला की, ते कर्ज फेडणे बंधनकारच असते; अन्यथा जमिनीसंबंधी पुढील व्यवहार होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याच्या वयाचा प्रश्न येतो कुठे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. अगोदरच वयोवृद्ध शेतकऱ्यांचा आधार संपलेला आहे. निसर्गाचीही साथ मिळत नाही. दरवर्षी शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट उभे राहत आहे. यात आता बँकांच्या जाचक अटींमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे.

पीककर्जाचे अर्ज स्वीकारले

वयोवृद्ध शेतकऱ्यांनी पीककर्ज मागणीचे अर्ज रीतसर भरून बँकांना दिले आहेत. बँकांनी हे अर्ज स्वीकारलेही आहेत. मात्र, आता शेतकरी विचारपूस करीत असताना वयाचे कारण पुढे करीत कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

प्रकरणे मार्गी लावावीत

बँकांनी विविध कारणे पुढे करून वयोवृद्ध शेतकऱ्यांची गैरसोय करू नये. शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज वाटप करण्यात यावे. वयोवृद्ध शेतकऱ्यांची गैरसोय होत असेल, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड यांनी दिला.

कर्ज कोण भरणार?

पीककर्ज घेणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे निधन झाले, तर कर्ज वसुलीसाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे पीककर्ज देताना संबंधित शेतकऱ्याचे वय पाहिले जाते. कर्ज घेतले आणि त्यानंतर त्यांचे निधन झाले, तर पीककर्ज भरणार कोण? असे एका शाखा व्यवस्थापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.