शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

अस्मितादर्शने साहित्याला नवीन चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:39 IST

अस्मितादर्शच्या माध्यमातून दिवंगत गंगाधर पानतावणे यांनी वंचित समाजाला एकत्रित करून एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले. आज त्यांचा हा वारसा निवेदीता पानतावणे यांनी पुढे नेत असल्याचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री तथा काँग्रेसच्या मागासवर्ग समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

ठळक मुद्देनितीन राऊत, श्रीपाल सबनीस, डी. बी. जगतपुरीया : साहित्यात स्वअनुभवातून वास्तव मांडण्याची परिवर्तनवाद्यांची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अस्मितादर्शच्या माध्यमातून दिवंगत गंगाधर पानतावणे यांनी वंचित समाजाला एकत्रित करून एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले. आज त्यांचा हा वारसा निवेदीता पानतावणे यांनी पुढे नेत असल्याचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री तथा काँग्रेसच्या मागासवर्ग समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.राऊत म्हणाले, गंगाधर पानतावणे यांनी नवीन लेखकांची पिढी घडवितांना त्यातून दर्जेदार सािहत्य निर्मिती कशी करावी या बद्दल टीप्स दिल्या. आज महाराष्ट्रात अनेकजण त्यांच्या प्रेरणेतून लिहिते झाले. माझा आणि गंगाधर पानतावणेंचा अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. लहानपणापासून मी सरांचा चाहता होतो. सरांच्या प्रेरणेतूनच नागपूर येथे अस्मितादर्शचे साहित्य संमेलन घेतल्याची आठवण डॉ. नितीन राऊत यांनी सांगितल्या. त्यांनी आजच्या एकूणच स्थितीवर परखड टीकेची झोड उठविली. आज देशात अघोषीत आणीबाणी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येकजण यामुळे अप्रत्यक्षपणे भयभित झाला आहे. एकूणच आजचे जालन्यातील हे साहित्य संमेलन म्हणजे एक दिशादर्शक घटना असल्याचे सांगून, कवी, लेखकांच्या लेखणीतील शब्दांमध्ये मोठ शक्ती असल्याचे ते म्हणाले. लेखकांनी समाजातील अन्याय, अत्याचार तसेच शोषित समाजातील अनुभव भयमुक्त मांडण्याचे धाडस करावे असे आवाहनी नीतीन राऊत यांनी केले. आजही मातंग समाजातील नवदांपत्याला लातूर जिल्ह्यात मंदिर प्रवेशापासून रोखून त्यांना मारहाण केल्या जात असल्याच्या घटना घडत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करत निषेध व्यक्त केला.देशात दोन आरएसएस : सबनीसदेशात दोन आरएसएस आहेत. असे वक्तव्य करून अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मोठी खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ज्या प्रमरणे उजव्या विचारणीत जातीयवाद आहे. तसाच तो डाव्या विचारणतही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आपल्याला आता डॉ. बाबासहेबांचा मध्यममार्ग स्विकारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सबनीस यांनी एकूणच त्यांच्या खास शैलित देश आणि राज्यातील सद्यस्थितीचा आढावा सादर केला. जातीय वादाची कोंडी फोडण्याचे आवाहनही त्यांनी केले. निळा झेंड्याचा मुद्दा काढून त्यांनी निळ्या झेंड्याने इतरांच्या रंगात समावून जाण्याची गरज नसून, निळ्या झेंड्याखाली सर्वानी एकत्रित येण्याची गरज व्यक्त केली. दिवंगत गंगधर पानतावणे आणि आपले संबंध हे १९८८ ला आले होते, असे सांगून त्यांनी गंगाधर पानतावणे हे माझे मानस बाप होते असे सांगितले. १९८८ पासून आपण या अस्मितादर्शशी जोडले गेलो असल्याचे सबनीस म्हणाले. अस्मितादर्शची वाटचाल ही विज्ञानवादी असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. अस्मितादर्श ही चळवळ केवळ विचारांची बांधिलकी जपणारी असल्याचा उल्लेखही सबनीस यांनी केला.दैववादावर अवलंबून राहू नका : जगत्पुरीयाप्राचीन काळापासून उच्चवर्णीयांनी आपल्या बहुजनांना देव, व्रतवैकल्य आणि चालीरिती चुकीच्या पध्दतीने बिंबवल्या आहेत. पाप-पुण्यचा उहापोह करून अशिक्षित समाजाला दैववादाकडे वळविले असे प्रतिपादन या संमेलनाचे अध्यक्ष डी.बी. जगत्पुरीया यांनी केले. ते म्हणाले, आज स्थिती बदलली आहे. शिक्षणामुळे काय खरे आणि काय खोटे हे समाजातील शेवटच्या घटकालाही कळू लागले आहे. यात साहित्यिकांचा मोठा वाटा आहे. कविता, कथा आणि त्यातील वास्तव अनुभव यामुळे दलित साहित्याला एक उंची मिळली आहे. ही मिळालेली उंची वाढविण्याचे काम अस्मितादर्शच्या माध्यमातून दिवंगत गंगाधर पानतावणे यांनी हक्काचे व्यासपीठी निर्माण केल्याने ती जनसामन्यांपर्यंत पोहचली आहे. कवीता तसेच अन्य साहित्यातून समाजाचा वास्तव चेहरा मांडण्याचा जो प्रयत्न सध्या दलित तसेच परिवर्तन साहित्यिकांकडून सुरू आहे.

टॅग्स :JalanaजालनाAsmitadarsh Sahitya Sammelanअस्मितादर्श साहित्य संमेलन