शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

अस्मितादर्शने साहित्याला नवीन चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:39 IST

अस्मितादर्शच्या माध्यमातून दिवंगत गंगाधर पानतावणे यांनी वंचित समाजाला एकत्रित करून एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले. आज त्यांचा हा वारसा निवेदीता पानतावणे यांनी पुढे नेत असल्याचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री तथा काँग्रेसच्या मागासवर्ग समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

ठळक मुद्देनितीन राऊत, श्रीपाल सबनीस, डी. बी. जगतपुरीया : साहित्यात स्वअनुभवातून वास्तव मांडण्याची परिवर्तनवाद्यांची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अस्मितादर्शच्या माध्यमातून दिवंगत गंगाधर पानतावणे यांनी वंचित समाजाला एकत्रित करून एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले. आज त्यांचा हा वारसा निवेदीता पानतावणे यांनी पुढे नेत असल्याचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री तथा काँग्रेसच्या मागासवर्ग समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.राऊत म्हणाले, गंगाधर पानतावणे यांनी नवीन लेखकांची पिढी घडवितांना त्यातून दर्जेदार सािहत्य निर्मिती कशी करावी या बद्दल टीप्स दिल्या. आज महाराष्ट्रात अनेकजण त्यांच्या प्रेरणेतून लिहिते झाले. माझा आणि गंगाधर पानतावणेंचा अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. लहानपणापासून मी सरांचा चाहता होतो. सरांच्या प्रेरणेतूनच नागपूर येथे अस्मितादर्शचे साहित्य संमेलन घेतल्याची आठवण डॉ. नितीन राऊत यांनी सांगितल्या. त्यांनी आजच्या एकूणच स्थितीवर परखड टीकेची झोड उठविली. आज देशात अघोषीत आणीबाणी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येकजण यामुळे अप्रत्यक्षपणे भयभित झाला आहे. एकूणच आजचे जालन्यातील हे साहित्य संमेलन म्हणजे एक दिशादर्शक घटना असल्याचे सांगून, कवी, लेखकांच्या लेखणीतील शब्दांमध्ये मोठ शक्ती असल्याचे ते म्हणाले. लेखकांनी समाजातील अन्याय, अत्याचार तसेच शोषित समाजातील अनुभव भयमुक्त मांडण्याचे धाडस करावे असे आवाहनी नीतीन राऊत यांनी केले. आजही मातंग समाजातील नवदांपत्याला लातूर जिल्ह्यात मंदिर प्रवेशापासून रोखून त्यांना मारहाण केल्या जात असल्याच्या घटना घडत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करत निषेध व्यक्त केला.देशात दोन आरएसएस : सबनीसदेशात दोन आरएसएस आहेत. असे वक्तव्य करून अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मोठी खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ज्या प्रमरणे उजव्या विचारणीत जातीयवाद आहे. तसाच तो डाव्या विचारणतही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आपल्याला आता डॉ. बाबासहेबांचा मध्यममार्ग स्विकारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सबनीस यांनी एकूणच त्यांच्या खास शैलित देश आणि राज्यातील सद्यस्थितीचा आढावा सादर केला. जातीय वादाची कोंडी फोडण्याचे आवाहनही त्यांनी केले. निळा झेंड्याचा मुद्दा काढून त्यांनी निळ्या झेंड्याने इतरांच्या रंगात समावून जाण्याची गरज नसून, निळ्या झेंड्याखाली सर्वानी एकत्रित येण्याची गरज व्यक्त केली. दिवंगत गंगधर पानतावणे आणि आपले संबंध हे १९८८ ला आले होते, असे सांगून त्यांनी गंगाधर पानतावणे हे माझे मानस बाप होते असे सांगितले. १९८८ पासून आपण या अस्मितादर्शशी जोडले गेलो असल्याचे सबनीस म्हणाले. अस्मितादर्शची वाटचाल ही विज्ञानवादी असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. अस्मितादर्श ही चळवळ केवळ विचारांची बांधिलकी जपणारी असल्याचा उल्लेखही सबनीस यांनी केला.दैववादावर अवलंबून राहू नका : जगत्पुरीयाप्राचीन काळापासून उच्चवर्णीयांनी आपल्या बहुजनांना देव, व्रतवैकल्य आणि चालीरिती चुकीच्या पध्दतीने बिंबवल्या आहेत. पाप-पुण्यचा उहापोह करून अशिक्षित समाजाला दैववादाकडे वळविले असे प्रतिपादन या संमेलनाचे अध्यक्ष डी.बी. जगत्पुरीया यांनी केले. ते म्हणाले, आज स्थिती बदलली आहे. शिक्षणामुळे काय खरे आणि काय खोटे हे समाजातील शेवटच्या घटकालाही कळू लागले आहे. यात साहित्यिकांचा मोठा वाटा आहे. कविता, कथा आणि त्यातील वास्तव अनुभव यामुळे दलित साहित्याला एक उंची मिळली आहे. ही मिळालेली उंची वाढविण्याचे काम अस्मितादर्शच्या माध्यमातून दिवंगत गंगाधर पानतावणे यांनी हक्काचे व्यासपीठी निर्माण केल्याने ती जनसामन्यांपर्यंत पोहचली आहे. कवीता तसेच अन्य साहित्यातून समाजाचा वास्तव चेहरा मांडण्याचा जो प्रयत्न सध्या दलित तसेच परिवर्तन साहित्यिकांकडून सुरू आहे.

टॅग्स :JalanaजालनाAsmitadarsh Sahitya Sammelanअस्मितादर्श साहित्य संमेलन