सप्टेंबर, २०२०च्या वीजबिलात ५० टक्के थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे. सप्टेंबर, २०२० पर्यंतच्या विलंब आकार, तसेच सप्टेंबर, २०१५ पूर्वीचे व्याज व दंड पूर्णत: माफ होणार आहे. या योजनेंतर्गत रोहित्र स्तरावर सर्व योजनेमधील कृषी ग्राहकांनी पूर्ण चालू वीजबिल व योजनांमधील थकबाकी भरल्यास, कृषिपंपाचे चालू दहा टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. नियमित वीजबिल भरणा कृषी ग्राहकांना चालू वीजबिल देय तारखेपर्यंत भरल्यास पाच टक्के अधिक सवलत राहणार आहे. गावांतर्गत सदर योजनेत सहभागी झालेले थकबाकी भरलेल्या रकमेतून ते ३३ टक्के रक्कम ही संबंधित गावातील त्या-त्या रोहित्रावरील वीज यंत्रणा दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या कालावधीत देण्यात आलेले सर्व चालू वीजदेयक देय दिनांक पूर्वीच भरणे बंधनकारक असून, सदरील योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण घनसावंगी कार्यालयाचे शाखा उंचेगाव उपविभागचे उपअभियंता विपिन मेश्राम यांनी केले आहे.
कृषी वीजबिल सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST