शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

चिंता वाढली : जिल्ह्यात वर्षभरात ११६७ जणांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:34 IST

ते म्हणाले की, जगाचा विचार करता, २९१९ मध्ये दर ४० सेकंदाला एक जण आत्महत्या करत होते अशी धक्कादायक आकडेवारी ...

ते म्हणाले की, जगाचा विचार करता, २९१९ मध्ये दर ४० सेकंदाला एक जण आत्महत्या करत होते अशी धक्कादायक आकडेवारी पुढे आली होती. भारताचा विचार करता, दरदिवशी आत्महत्या करणाऱ्याचे प्रमाण ३८१ इतके होते. तर जालन्याचा विचार करता, शेतकरी आत्महत्येसह अन्य नागरिकांनी मग त्यात युवक-युवती, महिला आणि पुरुषांचा विचार करता ही आकडेवारी ११६७ एवढी असल्याचे दिसून आले.

चौकट

आत्महत्या रोखण्यासाठी जागृती

आत्महत्या करणे हा गुन्हा मानला जात आहे. मिळालेले सुंदर जीवन केवळ तुलना, ताणतणाव, व्यसन आणि इर्ष्येसह रागातून आत्महत्या केल्या जात असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. युवक-युवतींचा विचार करता, त्यांच्याकडून पालकांच्या वाढलेल्या अधिकच्या अपेक्षा यादेखील कारणीभूत असल्याचे दिसून आले. ही सर्व कारणे महत्त्वाची ठरतात. त्यामुळे वरील कारणांवर मात करण्यासाठी जागितक स्तरावर आता अधिकची जागृती करून समुपदेशन केले जात आहे.

अनेक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

आत्महत्या करणे म्हणजे स्वत:ला संपवणे आहे. स्वत:ला संपवून प्रश्न सुटत नाहीत, तर ते अधिक गंभीर बनतात याचा विचार व्हावा. एखाद्या कर्ता पुरुषाने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्यास त्याचे सर्व कुटुंब उघड्यावर येते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच युवक-युवती हे नैराश्यात कसे जाणार नाहीत, हेही पालकांनी पाहिले पाहिजे. आत्महत्येचा विचार हा क्वचितच झटकन येतो. परंतु अनेक अभ्यासाअंती असे दिसून आले आहे की, सरासरी सहा महिने आधीपासूनच डिप्रेशनमध्ये गेलेली व्यक्ती ही शेवटचा जीवन संपविण्याचा मार्ग स्वीकारते असे दिसून आले आहे.

चौकट

एकत्रित कुटुंबात कमी प्रमाण

हल्ली एकत्र कुटुंब पध्दती लोप पावत असून, हम दो हमारे दो... असे समीकरण झाले आहे. त्यातच प्लॅटसंस्कृती वाढल्याने एकटेपण वाढले आहे. तसेच पालक आणि मुलांमधील संवाद कमी होणे हेदेखील एक गंभीर कारण आत्महत्या करण्यामागे असल्याचे दिसून आले आहे. आमच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देश आणि राज्यात या आत्महत्या रोखण्यासाठी व्याख्याने, समुपदेश शिबिरांचे आयोजन करत आहोत.

- डॉ. सूरज सेठिया, मानसोपचार तज्ज्ञ, जालना