शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

स्टिल उद्योगासाठी १८०० कोटीची सबसिडी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

जालना : जालना येथील भूमिपुत्रांनी अनेक संकटांवर मात करीत स्टिल कारखानदारी टिकवून ठेवली आहे. त्यामुळे तीस हजारावर कामगारांना रोजगार ...

जालना : जालना येथील भूमिपुत्रांनी अनेक संकटांवर मात करीत स्टिल कारखानदारी टिकवून ठेवली आहे. त्यामुळे तीस हजारावर कामगारांना रोजगार मिळाला आहे. हे कारखाने उदध्वस्त होऊ नयेत, यासाठी कारखानदारांसाठी १८०० कोटी रुपयांची सबसिडी तत्काळ जाहीर करावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य विधिमंडळ आश्‍वासन समितीचे प्रमुख आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना केली.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी सायंकाळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना शहरातील स्टिल कारखानदारांच्या अडीअडचणी आपल्या भाषणातून अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. जालना हे औद्योगिक शहर असून, स्टिल व सीडस उद्योगासाठी भारतात प्रसिद्ध आहे. जालना शहरातील स्टिल उद्योग अनेक संकट आणि अडचणींचा सामना करताना स्पर्धेच्या युगातही जालन्याचे भूमिपुत्र आजही नेटाने चालवतात. महाराष्ट्रातील उद्योगासाठी विजेचा दर प्रती युनिटसाठी ७ रुपये ३० पैसे आकारण्यात येतो. याउलट छत्तीसगड राज्यात ४ रुपये प्रति युनिट तर गुजरातमध्ये केवळ ५ रुपये ५० पैसे प्रती युनिट वीज दर आकारण्यात येतो. जालना शहरातील स्टिल कारखानदार प्रत्येक महिन्याला १५० कोटी रुपये तर वर्षाला दोन हजार कोटी रुपये इतके वीज बिल भरणा करतात. जीएसटीपोटी प्रत्येक महिन्याला ५० कोटी आणि वर्षाला ६०० कोटी रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळवून देतात. जालन्यातील हे कारखानदार गुजरात किंवा छत्तीसगड राज्यात देखील जाऊ शकतात. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने या कारखानदारांना एक रुपयांची देखील सबसिडी आतापर्यंत जाहीर केलेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधून आ. गोरंट्याल म्हणाले, जालन्यातील स्टिल कारखान्यांमध्ये तब्बल ३० हजार कामगारांना रोजगार मिळालेला आहे. मागील फडणवीस सरकारने ही कारखानदारी जिवंत ठेवण्यासाठी तब्बल १२०० कोटी रुपयांची सबसिडी दिली होती. महाविकास आघाडी सरकारने त्यात वाढ करुन किमान १८०० कोटी रुपयांची सबसिडी या कारखानदारांना देण्याची गरज आहे. सरकारने सबसिडी दिली तरच हे कारखाने जिवंत राहतील, असेही गोरंट्याल म्हणाले.