शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

स्टिल उद्योगासाठी १८०० कोटीची सबसिडी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

जालना : जालना येथील भूमिपुत्रांनी अनेक संकटांवर मात करीत स्टिल कारखानदारी टिकवून ठेवली आहे. त्यामुळे तीस हजारावर कामगारांना रोजगार ...

जालना : जालना येथील भूमिपुत्रांनी अनेक संकटांवर मात करीत स्टिल कारखानदारी टिकवून ठेवली आहे. त्यामुळे तीस हजारावर कामगारांना रोजगार मिळाला आहे. हे कारखाने उदध्वस्त होऊ नयेत, यासाठी कारखानदारांसाठी १८०० कोटी रुपयांची सबसिडी तत्काळ जाहीर करावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य विधिमंडळ आश्‍वासन समितीचे प्रमुख आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना केली.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी सायंकाळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना शहरातील स्टिल कारखानदारांच्या अडीअडचणी आपल्या भाषणातून अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. जालना हे औद्योगिक शहर असून, स्टिल व सीडस उद्योगासाठी भारतात प्रसिद्ध आहे. जालना शहरातील स्टिल उद्योग अनेक संकट आणि अडचणींचा सामना करताना स्पर्धेच्या युगातही जालन्याचे भूमिपुत्र आजही नेटाने चालवतात. महाराष्ट्रातील उद्योगासाठी विजेचा दर प्रती युनिटसाठी ७ रुपये ३० पैसे आकारण्यात येतो. याउलट छत्तीसगड राज्यात ४ रुपये प्रति युनिट तर गुजरातमध्ये केवळ ५ रुपये ५० पैसे प्रती युनिट वीज दर आकारण्यात येतो. जालना शहरातील स्टिल कारखानदार प्रत्येक महिन्याला १५० कोटी रुपये तर वर्षाला दोन हजार कोटी रुपये इतके वीज बिल भरणा करतात. जीएसटीपोटी प्रत्येक महिन्याला ५० कोटी आणि वर्षाला ६०० कोटी रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळवून देतात. जालन्यातील हे कारखानदार गुजरात किंवा छत्तीसगड राज्यात देखील जाऊ शकतात. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने या कारखानदारांना एक रुपयांची देखील सबसिडी आतापर्यंत जाहीर केलेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधून आ. गोरंट्याल म्हणाले, जालन्यातील स्टिल कारखान्यांमध्ये तब्बल ३० हजार कामगारांना रोजगार मिळालेला आहे. मागील फडणवीस सरकारने ही कारखानदारी जिवंत ठेवण्यासाठी तब्बल १२०० कोटी रुपयांची सबसिडी दिली होती. महाविकास आघाडी सरकारने त्यात वाढ करुन किमान १८०० कोटी रुपयांची सबसिडी या कारखानदारांना देण्याची गरज आहे. सरकारने सबसिडी दिली तरच हे कारखाने जिवंत राहतील, असेही गोरंट्याल म्हणाले.