शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊ साठे हे बहुजन चळवळीचे खरे नायक

By admin | Updated: July 31, 2014 00:46 IST

जालना : शोषित व उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडून सामाजिक क्रांतीचा विचार देणारे अण्णा भाऊ साठे हे बहुजन चळवळीचे खरे नायक आहेत,

जालना : शोषित व उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडून सामाजिक क्रांतीचा विचार देणारे अण्णा भाऊ साठे हे बहुजन चळवळीचे खरे नायक आहेत, त्यांचे विचार तरुण पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील विचारवंत तथा बीसीईएफचे प्रदेशाध्यक्ष एच. पी. कांबळे यांनी येथे केले.जालना येथील लोकमंगल प्रतिष्ठानतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कचरु साळवे, अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने, मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राऊत आदींची उपस्थिती होती.यावेळी आपले विचार मांडताना कांबळे म्हणाले की, समाज व्यवस्थेने नागवलेल्या माणसांना जगण्यासाठी पुरेशी संधी नव्हती. अस्तित्व टिकवून जगण्यासाठी धडपडणाऱ्या अशा माणसांना नायक आणि नायिका बनवून अण्णा भाऊंनी त्यांना जगासमोर आणले. त्यांच्यातील लढाऊ वृत्ती दाखवून दिली. अण्णा भाऊंचे नायक आणि नायिका कष्टकरी आहेत तसेच स्वाभिमानी आणि बंडखोरही आहेत. त्यामुळेच ते सामान्य माणसांना जगण्यासाठी बळ देतात. विपुल असे साहित्य लेखन करुनही अण्णा भाऊ साठे उपेक्षित राहिले. जसे त्यांचे साहित्य उपेक्षित राहिले. तशीच उपेक्षा त्यांच्या जीवनातही आली. शाहु-फुले-आंबेडकरांचे विचार सोबत घेवून लढणारे अण्णा भाऊ हे विद्रोही साहित्यिक आहेत. तसेच आपल्या बहुजन चळवळीला परिवर्तनाचा विचार देणारे नायकही आहेत. मातंग समाजाने अण्णा भाऊंचे विचार आत्मसात करुन फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या चळवळीसोबत रहावे तरच त्यांचा विकास होईल. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी अण्णा भाऊंचे विचार आत्मसात करण्याची गरज कांबळे यांनी विषद केली. यावेळी कचरु साळवे, अ‍ॅड. आदमाने राऊत आदींनी विचार मांडले.अध्यक्षीय समारोपात अंबेकर म्हणाले, महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. महापुरुषांचे विचार पेरण्याचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजाने पाठबळ देण्याची गरज असून, परिवर्तनाचा विचारच समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल, असे ते म्हणाले.प्रारंभी व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष संजय खोतकर, सचिव अशोक घोडे, उपाध्यक्ष शेख इब्राहिम, गणेश चांदोडे, सहसचिव हरेश रत्नपारखे, सदस्य डॉ. बालासाहेब पिंपळे आदींनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद सावंत यांनी केले. हरेश रत्नपारखे यांनी आभार मानले.यावेळी शिवसेनेचे पंडितराव भुतेकर, मनसेचे ज्ञानेश्वर गायकवाड, अ‍ॅड. बी. एम. साळवे, अशोक साबळे, डॉ. विजयकुमार कुमठेकर, सुधाकर निकाळजे, रोहिदास गंगातिवरे, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व महिलांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)सामन्य बनले नायक़.. समाज व्यवस्थेने नागवलेल्या माणसांना जगण्यासाठी पुरेशी संधी नव्हती. अस्तित्व टिकवून जगण्यासाठी धडपडणाऱ्या अशा माणसांना नायक आणि नायिका बनवून अण्णा भाऊंनी त्यांना जगासमोर आणले. त्यांच्यातील लढाऊ वृत्ती दाखवून दिली.