शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

अण्णा भाऊ साठे हे बहुजन चळवळीचे खरे नायक

By admin | Updated: July 31, 2014 00:46 IST

जालना : शोषित व उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडून सामाजिक क्रांतीचा विचार देणारे अण्णा भाऊ साठे हे बहुजन चळवळीचे खरे नायक आहेत,

जालना : शोषित व उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडून सामाजिक क्रांतीचा विचार देणारे अण्णा भाऊ साठे हे बहुजन चळवळीचे खरे नायक आहेत, त्यांचे विचार तरुण पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील विचारवंत तथा बीसीईएफचे प्रदेशाध्यक्ष एच. पी. कांबळे यांनी येथे केले.जालना येथील लोकमंगल प्रतिष्ठानतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कचरु साळवे, अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने, मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राऊत आदींची उपस्थिती होती.यावेळी आपले विचार मांडताना कांबळे म्हणाले की, समाज व्यवस्थेने नागवलेल्या माणसांना जगण्यासाठी पुरेशी संधी नव्हती. अस्तित्व टिकवून जगण्यासाठी धडपडणाऱ्या अशा माणसांना नायक आणि नायिका बनवून अण्णा भाऊंनी त्यांना जगासमोर आणले. त्यांच्यातील लढाऊ वृत्ती दाखवून दिली. अण्णा भाऊंचे नायक आणि नायिका कष्टकरी आहेत तसेच स्वाभिमानी आणि बंडखोरही आहेत. त्यामुळेच ते सामान्य माणसांना जगण्यासाठी बळ देतात. विपुल असे साहित्य लेखन करुनही अण्णा भाऊ साठे उपेक्षित राहिले. जसे त्यांचे साहित्य उपेक्षित राहिले. तशीच उपेक्षा त्यांच्या जीवनातही आली. शाहु-फुले-आंबेडकरांचे विचार सोबत घेवून लढणारे अण्णा भाऊ हे विद्रोही साहित्यिक आहेत. तसेच आपल्या बहुजन चळवळीला परिवर्तनाचा विचार देणारे नायकही आहेत. मातंग समाजाने अण्णा भाऊंचे विचार आत्मसात करुन फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या चळवळीसोबत रहावे तरच त्यांचा विकास होईल. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी अण्णा भाऊंचे विचार आत्मसात करण्याची गरज कांबळे यांनी विषद केली. यावेळी कचरु साळवे, अ‍ॅड. आदमाने राऊत आदींनी विचार मांडले.अध्यक्षीय समारोपात अंबेकर म्हणाले, महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. महापुरुषांचे विचार पेरण्याचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजाने पाठबळ देण्याची गरज असून, परिवर्तनाचा विचारच समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल, असे ते म्हणाले.प्रारंभी व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष संजय खोतकर, सचिव अशोक घोडे, उपाध्यक्ष शेख इब्राहिम, गणेश चांदोडे, सहसचिव हरेश रत्नपारखे, सदस्य डॉ. बालासाहेब पिंपळे आदींनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद सावंत यांनी केले. हरेश रत्नपारखे यांनी आभार मानले.यावेळी शिवसेनेचे पंडितराव भुतेकर, मनसेचे ज्ञानेश्वर गायकवाड, अ‍ॅड. बी. एम. साळवे, अशोक साबळे, डॉ. विजयकुमार कुमठेकर, सुधाकर निकाळजे, रोहिदास गंगातिवरे, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व महिलांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)सामन्य बनले नायक़.. समाज व्यवस्थेने नागवलेल्या माणसांना जगण्यासाठी पुरेशी संधी नव्हती. अस्तित्व टिकवून जगण्यासाठी धडपडणाऱ्या अशा माणसांना नायक आणि नायिका बनवून अण्णा भाऊंनी त्यांना जगासमोर आणले. त्यांच्यातील लढाऊ वृत्ती दाखवून दिली.