शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन तालुक्यात जनावरे चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST

भोकरदन - भोकरदन तालुक्यात मागील काही दिवसांपासून जनावरे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी अदयाप एकाही चोरट्याला पकडले नाही. ...

भोकरदन - भोकरदन तालुक्यात मागील काही दिवसांपासून जनावरे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी अदयाप एकाही चोरट्याला पकडले नाही. त्यातच बुधवारी मध्यरात्री भोकरदन, नांजा व बोरगाव जहांगीर येथील सात जनावरे चोरी गेली आहेत. चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. नांजा येथील समाधान विठ्ठल मोरे यांनी बुधवारी सायंकाळी दोन बैल व एक गाय गोठ्यात बांधली होती. त्यानंतर ते घरी गेले. गुरुवारी सकाळी शेतात आले असता, त्यांना जनावरे दिसली नाहीत. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे भोकरदन ते मासनपूर रस्त्यावरील गोविंद गणपत जाधव यांचे दोन बैल चोरट्यांनी गाडी टाकून नेले. या गाडीचा पाठलाग करेपर्यंत चोरट्यांनी गाडी पळवून नेली. त्यानंतर बोरगाव जहागीर येथील भगवान कुदर यांचा ५० हजार रुपये किमतीचा एक बैल चोरीस गेला आहे. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोकरदन तालुक्यात मागील काही दिवसांपासून जनावरे चोरीच्या घटना घडत आहेत. असे असतानाही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत एकाही चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. पोलीस प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांनी उपोषणदेखील केले होते. परंतु, त्याचा काही फायदा झाला नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

भोकरदन तालुक्यात जनावरे चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. भोकरदन, बाभुळगाव, डावरगाव, दानापूर, दगडवाडी या गावांतून आतापर्यंत जवळपास ५० जनावरे चोरीला गेली आहेत. पोलिसांना एकाही गुन्ह्याचा तपास लावता आला नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

आशा पांडे, जि. प. सदस्या