शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्यास परवानगी; शिक्षण विभागाकडे अद्याप शासकीय पत्र अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST

जालना : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते नववीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश दिला आहे; परंतु याबबात शिक्षण विभागाला अद्याप ...

जालना : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते नववीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश दिला आहे; परंतु याबबात शिक्षण विभागाला अद्याप लेखी पत्र प्राप्त झालेले नाही.

कोरोनामुळे चालू शैक्षणिक वर्षात चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सूचनेनुसार ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. काही शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून त्यांना घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्रमही राबिवला आहे. शाळा केव्हा सुरू होणार? याबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये असलेली उत्सुकता आता संपली आहे. एकीकडे शाळेत जाण्याची इच्छा असली तरी कोरोनाची भीती अनेकांच्या मनात आहे; परंतु नववी ते बारावी वर्ग आता नियमित सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० टक्क्यांच्या आसपास राहत आहे. सूचनांचे पालन झाल्याने एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही. त्यामुळे पाचवी ते आठवीचे विद्यार्थी, आणि पालक शाळा सुरू झाल्यानंतर कोणती भूमिका घेणार? याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

नववी ते बारावीची सत्तर टक्के उपस्थिती

लॉकडाऊन शिथिलतेनंतर यापूर्वी नववी ते बरावीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले आहेत. प्रारंभीच्या काळात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती; परंतु शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती आता सत्तर टक्क्यांहून अधिक राहत आहे. विशेष म्हणजे कोरोनातील सूचनांचे पालन केले जात आहे. त्यामुळे आजवर एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही.

शाळा सुरू करण्यापूर्वी शासकीय सूचनांचे पालन

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी संपूर्ण शाळेची इमारत, वर्गखोल्यांसह परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.

शासन निर्देशानुसार विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती ठेवली जाणार असून, कोरोनाबाबत शासन, प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी, शिक्षकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

विशेषत: शाळा सुरू होण्यापूर्वीच पाचवी ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांची कोरोना तपासणीही करून घेतली जाणार आहे.

शासकीय सूचनेनुसार काम

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. अद्याप शासनाकडून लेखी पत्र आलेले नाही. शासनाचे पत्र प्राप्त होताच शासकीय सूचनांचे पालन करून शाळा सुरू होतील.

-कैलास दातखीळ,

शिक्षणाधिकारी

पाचवी ३८,४५२

सहावी ३७,९२१

सातवी ३६,९१८

आठवी ३६,०२७

जिल्ह्यातील शाळांची संख्या

१,८९४

जिल्ह्यातील शिक्षक संख्या

१२,२७५