शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्यास परवानगी; शिक्षण विभागाकडे अद्याप शासकीय पत्र अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST

जालना : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते नववीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश दिला आहे; परंतु याबबात शिक्षण विभागाला अद्याप ...

जालना : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते नववीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश दिला आहे; परंतु याबबात शिक्षण विभागाला अद्याप लेखी पत्र प्राप्त झालेले नाही.

कोरोनामुळे चालू शैक्षणिक वर्षात चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सूचनेनुसार ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. काही शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून त्यांना घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्रमही राबिवला आहे. शाळा केव्हा सुरू होणार? याबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये असलेली उत्सुकता आता संपली आहे. एकीकडे शाळेत जाण्याची इच्छा असली तरी कोरोनाची भीती अनेकांच्या मनात आहे; परंतु नववी ते बारावी वर्ग आता नियमित सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० टक्क्यांच्या आसपास राहत आहे. सूचनांचे पालन झाल्याने एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही. त्यामुळे पाचवी ते आठवीचे विद्यार्थी, आणि पालक शाळा सुरू झाल्यानंतर कोणती भूमिका घेणार? याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

नववी ते बारावीची सत्तर टक्के उपस्थिती

लॉकडाऊन शिथिलतेनंतर यापूर्वी नववी ते बरावीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले आहेत. प्रारंभीच्या काळात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती; परंतु शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती आता सत्तर टक्क्यांहून अधिक राहत आहे. विशेष म्हणजे कोरोनातील सूचनांचे पालन केले जात आहे. त्यामुळे आजवर एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही.

शाळा सुरू करण्यापूर्वी शासकीय सूचनांचे पालन

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी संपूर्ण शाळेची इमारत, वर्गखोल्यांसह परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.

शासन निर्देशानुसार विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती ठेवली जाणार असून, कोरोनाबाबत शासन, प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी, शिक्षकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

विशेषत: शाळा सुरू होण्यापूर्वीच पाचवी ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांची कोरोना तपासणीही करून घेतली जाणार आहे.

शासकीय सूचनेनुसार काम

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. अद्याप शासनाकडून लेखी पत्र आलेले नाही. शासनाचे पत्र प्राप्त होताच शासकीय सूचनांचे पालन करून शाळा सुरू होतील.

-कैलास दातखीळ,

शिक्षणाधिकारी

पाचवी ३८,४५२

सहावी ३७,९२१

सातवी ३६,९१८

आठवी ३६,०२७

जिल्ह्यातील शाळांची संख्या

१,८९४

जिल्ह्यातील शिक्षक संख्या

१२,२७५