शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्यास परवानगी; शिक्षण विभागाकडे अद्याप शासकीय पत्र अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST

जालना : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते नववीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश दिला आहे; परंतु याबबात शिक्षण विभागाला अद्याप ...

जालना : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते नववीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश दिला आहे; परंतु याबबात शिक्षण विभागाला अद्याप लेखी पत्र प्राप्त झालेले नाही.

कोरोनामुळे चालू शैक्षणिक वर्षात चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सूचनेनुसार ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. काही शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून त्यांना घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्रमही राबिवला आहे. शाळा केव्हा सुरू होणार? याबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये असलेली उत्सुकता आता संपली आहे. एकीकडे शाळेत जाण्याची इच्छा असली तरी कोरोनाची भीती अनेकांच्या मनात आहे; परंतु नववी ते बारावी वर्ग आता नियमित सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० टक्क्यांच्या आसपास राहत आहे. सूचनांचे पालन झाल्याने एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही. त्यामुळे पाचवी ते आठवीचे विद्यार्थी, आणि पालक शाळा सुरू झाल्यानंतर कोणती भूमिका घेणार? याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

नववी ते बारावीची सत्तर टक्के उपस्थिती

लॉकडाऊन शिथिलतेनंतर यापूर्वी नववी ते बरावीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले आहेत. प्रारंभीच्या काळात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती; परंतु शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती आता सत्तर टक्क्यांहून अधिक राहत आहे. विशेष म्हणजे कोरोनातील सूचनांचे पालन केले जात आहे. त्यामुळे आजवर एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही.

शाळा सुरू करण्यापूर्वी शासकीय सूचनांचे पालन

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी संपूर्ण शाळेची इमारत, वर्गखोल्यांसह परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.

शासन निर्देशानुसार विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती ठेवली जाणार असून, कोरोनाबाबत शासन, प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी, शिक्षकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

विशेषत: शाळा सुरू होण्यापूर्वीच पाचवी ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांची कोरोना तपासणीही करून घेतली जाणार आहे.

शासकीय सूचनेनुसार काम

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. अद्याप शासनाकडून लेखी पत्र आलेले नाही. शासनाचे पत्र प्राप्त होताच शासकीय सूचनांचे पालन करून शाळा सुरू होतील.

-कैलास दातखीळ,

शिक्षणाधिकारी

पाचवी ३८,४५२

सहावी ३७,९२१

सातवी ३६,९१८

आठवी ३६,०२७

जिल्ह्यातील शाळांची संख्या

१,८९४

जिल्ह्यातील शिक्षक संख्या

१२,२७५