शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

सगळं काही हिरावलं, तरीही आनंदाने जगतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:27 IST

लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू असताना एचआयव्हीने आनंदच हिरावून घेतला. या आजारामुळे आधी नवरा आणि नंतर मुलगा गेला. त्यामुळे जगण्याची उमेदच गेली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यातून वाचले. या धक्क्यानंतरही आज आनंदाने आयुष्य जगत असताना इतरांनाही मदत करत आहे, असे मनाला गोठवून टाकणारा अनुभव जामखेड येथील रत्नमाला चव्हाण-जाधव यांनी कथन केला.

ठळक मुद्देरत्नमाला चव्हाण : गांधी विचार शिबिरात सांगितले एचआयव्हीनंतरचे अनुभव

जालना : लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू असताना एचआयव्हीने आनंदच हिरावून घेतला. या आजारामुळे आधी नवरा आणि नंतर मुलगा गेला. त्यामुळे जगण्याची उमेदच गेली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यातून वाचले. या धक्क्यानंतरही आज आनंदाने आयुष्य जगत असताना इतरांनाही मदत करत आहे, असे मनाला गोठवून टाकणारा अनुभव जामखेड येथील रत्नमाला चव्हाण-जाधव यांनी कथन केला.जेईएस महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने आयोजित १४ व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात ‘माझा जीवन अनुभव’ या अनुभव कथनात त्या शुक्रवारी बोलत होत्या. रत्नमाला म्हणाल्या, अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी खंडेश्वरी नावाचे माझे गाव. वयाच्या पंधराव्या वर्षी पनवेल येथील एका वाहनचालकाशी माझे लग्न झाले. आनंदाने संसार सुरू असताना दीड वर्षानंतर पती सारखे आजारी पडू लागले. बाळंतपणासाठी माहेरी आले असता नवºयाची प्रकृती खालावली. बाळांतपणानंतर मी मुलाला घेऊन सासरी गेले. नवºयाला एचआयव्हीची लागण झाल्याचे कळल्यानंतर मला धक्काच बसला. त्यानंतर मलाही एचआयव्ही संक्रमण झाल्याचे निष्पण्ण झाले. सोसायटी सोडून नवºयाच्या गावी आलो. तिथेही त्रास झाला. शेतात राहायला गेलो. प्रकृती खालावल्याने २००१ मध्ये पतीचा मृत्यू झाला. पती गेल्यानंतर माहेरी आले. आईसोबत राहू लागले. तिला आजाराबद्दल कळल्यानंतर तिनेही नाकारले. गावात कुणी कामही देईना. एकेदिवशी अकरा महिन्यांचे बाळ मरुन पडलेले होते. नवरा गेला, मुलगाही गेला, मग जगायचे कशासाठी म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातच जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात काम करणाºया एका आरोग्य सेविकेने माझा परिचय डॉ. रजनीकांत आरोळे यांच्याशी करून दिला. औषधोपचार सुरू झाले. डॉ. आरोळे यांनी माझी मुलीप्रमाणे काळजी घेतली. जन्मदात्या आईने नाकारले, सासू-सासºयांनी घराबाहेर काढले.समाजाने हेटाळणी केली. मात्र, डॉ. आरोळेंसारख्या देवदुताने मला जगण्याचा एक प्रकाश किरण दाखवला, असे मनाला गोठवून टाकणारे अनुभव रत्नमाला यांनी सांगितले. त्यांची ही संघर्ष कहाणी ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले.