शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सगळं काही हिरावलं, तरीही आनंदाने जगतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:27 IST

लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू असताना एचआयव्हीने आनंदच हिरावून घेतला. या आजारामुळे आधी नवरा आणि नंतर मुलगा गेला. त्यामुळे जगण्याची उमेदच गेली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यातून वाचले. या धक्क्यानंतरही आज आनंदाने आयुष्य जगत असताना इतरांनाही मदत करत आहे, असे मनाला गोठवून टाकणारा अनुभव जामखेड येथील रत्नमाला चव्हाण-जाधव यांनी कथन केला.

ठळक मुद्देरत्नमाला चव्हाण : गांधी विचार शिबिरात सांगितले एचआयव्हीनंतरचे अनुभव

जालना : लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू असताना एचआयव्हीने आनंदच हिरावून घेतला. या आजारामुळे आधी नवरा आणि नंतर मुलगा गेला. त्यामुळे जगण्याची उमेदच गेली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यातून वाचले. या धक्क्यानंतरही आज आनंदाने आयुष्य जगत असताना इतरांनाही मदत करत आहे, असे मनाला गोठवून टाकणारा अनुभव जामखेड येथील रत्नमाला चव्हाण-जाधव यांनी कथन केला.जेईएस महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने आयोजित १४ व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात ‘माझा जीवन अनुभव’ या अनुभव कथनात त्या शुक्रवारी बोलत होत्या. रत्नमाला म्हणाल्या, अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी खंडेश्वरी नावाचे माझे गाव. वयाच्या पंधराव्या वर्षी पनवेल येथील एका वाहनचालकाशी माझे लग्न झाले. आनंदाने संसार सुरू असताना दीड वर्षानंतर पती सारखे आजारी पडू लागले. बाळंतपणासाठी माहेरी आले असता नवºयाची प्रकृती खालावली. बाळांतपणानंतर मी मुलाला घेऊन सासरी गेले. नवºयाला एचआयव्हीची लागण झाल्याचे कळल्यानंतर मला धक्काच बसला. त्यानंतर मलाही एचआयव्ही संक्रमण झाल्याचे निष्पण्ण झाले. सोसायटी सोडून नवºयाच्या गावी आलो. तिथेही त्रास झाला. शेतात राहायला गेलो. प्रकृती खालावल्याने २००१ मध्ये पतीचा मृत्यू झाला. पती गेल्यानंतर माहेरी आले. आईसोबत राहू लागले. तिला आजाराबद्दल कळल्यानंतर तिनेही नाकारले. गावात कुणी कामही देईना. एकेदिवशी अकरा महिन्यांचे बाळ मरुन पडलेले होते. नवरा गेला, मुलगाही गेला, मग जगायचे कशासाठी म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातच जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात काम करणाºया एका आरोग्य सेविकेने माझा परिचय डॉ. रजनीकांत आरोळे यांच्याशी करून दिला. औषधोपचार सुरू झाले. डॉ. आरोळे यांनी माझी मुलीप्रमाणे काळजी घेतली. जन्मदात्या आईने नाकारले, सासू-सासºयांनी घराबाहेर काढले.समाजाने हेटाळणी केली. मात्र, डॉ. आरोळेंसारख्या देवदुताने मला जगण्याचा एक प्रकाश किरण दाखवला, असे मनाला गोठवून टाकणारे अनुभव रत्नमाला यांनी सांगितले. त्यांची ही संघर्ष कहाणी ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले.