शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सगळं काही हिरावलं, तरीही आनंदाने जगतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:27 IST

लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू असताना एचआयव्हीने आनंदच हिरावून घेतला. या आजारामुळे आधी नवरा आणि नंतर मुलगा गेला. त्यामुळे जगण्याची उमेदच गेली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यातून वाचले. या धक्क्यानंतरही आज आनंदाने आयुष्य जगत असताना इतरांनाही मदत करत आहे, असे मनाला गोठवून टाकणारा अनुभव जामखेड येथील रत्नमाला चव्हाण-जाधव यांनी कथन केला.

ठळक मुद्देरत्नमाला चव्हाण : गांधी विचार शिबिरात सांगितले एचआयव्हीनंतरचे अनुभव

जालना : लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू असताना एचआयव्हीने आनंदच हिरावून घेतला. या आजारामुळे आधी नवरा आणि नंतर मुलगा गेला. त्यामुळे जगण्याची उमेदच गेली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यातून वाचले. या धक्क्यानंतरही आज आनंदाने आयुष्य जगत असताना इतरांनाही मदत करत आहे, असे मनाला गोठवून टाकणारा अनुभव जामखेड येथील रत्नमाला चव्हाण-जाधव यांनी कथन केला.जेईएस महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने आयोजित १४ व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात ‘माझा जीवन अनुभव’ या अनुभव कथनात त्या शुक्रवारी बोलत होत्या. रत्नमाला म्हणाल्या, अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी खंडेश्वरी नावाचे माझे गाव. वयाच्या पंधराव्या वर्षी पनवेल येथील एका वाहनचालकाशी माझे लग्न झाले. आनंदाने संसार सुरू असताना दीड वर्षानंतर पती सारखे आजारी पडू लागले. बाळंतपणासाठी माहेरी आले असता नवºयाची प्रकृती खालावली. बाळांतपणानंतर मी मुलाला घेऊन सासरी गेले. नवºयाला एचआयव्हीची लागण झाल्याचे कळल्यानंतर मला धक्काच बसला. त्यानंतर मलाही एचआयव्ही संक्रमण झाल्याचे निष्पण्ण झाले. सोसायटी सोडून नवºयाच्या गावी आलो. तिथेही त्रास झाला. शेतात राहायला गेलो. प्रकृती खालावल्याने २००१ मध्ये पतीचा मृत्यू झाला. पती गेल्यानंतर माहेरी आले. आईसोबत राहू लागले. तिला आजाराबद्दल कळल्यानंतर तिनेही नाकारले. गावात कुणी कामही देईना. एकेदिवशी अकरा महिन्यांचे बाळ मरुन पडलेले होते. नवरा गेला, मुलगाही गेला, मग जगायचे कशासाठी म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातच जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात काम करणाºया एका आरोग्य सेविकेने माझा परिचय डॉ. रजनीकांत आरोळे यांच्याशी करून दिला. औषधोपचार सुरू झाले. डॉ. आरोळे यांनी माझी मुलीप्रमाणे काळजी घेतली. जन्मदात्या आईने नाकारले, सासू-सासºयांनी घराबाहेर काढले.समाजाने हेटाळणी केली. मात्र, डॉ. आरोळेंसारख्या देवदुताने मला जगण्याचा एक प्रकाश किरण दाखवला, असे मनाला गोठवून टाकणारे अनुभव रत्नमाला यांनी सांगितले. त्यांची ही संघर्ष कहाणी ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले.