शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी कारखान्यांना उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST

वडीगोद्री/ अंकुशनगर : जिल्ह्यातील अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे असून, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यावर ...

वडीगोद्री/ अंकुशनगर : जिल्ह्यातील अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे असून, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यावर याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.

या बैठकीस पालकमंत्री राजेश टोपे, साखर आयुक्तांचे प्रतिनिधी पांडुरंग शेळके, विशेष लेखा परीक्षक रशीद शेख यांच्यासह शेजारील जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सोमवारी ही बैठक घेण्यात आली. समर्थ कारखान्याच्या कार्यक्षेत्रात साडेसात लाख मेट्रिक टन ऊस अतिरिक्त आहे. शिवाय जिल्ह्यातही उसाचा अतिरिक्त प्रश्न गंभीर आहे. या उसाचे गाळप करण्यासाठी चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर बारामती अ‍ॅग्रोने दीड लाख मे. टन, रामेश्वर सहकारी कारखाना भोकरदन ५० हजार मे टन, गंगामैया अ‍ॅग्रोने १ लाख मे टन, छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग ५० हजार मे टन, मुक्ताईनगर शुगर्स ३० हजार मे टन, लक्ष्मी नरसिंह शुगर्स परभणी २५ हजार मे टन, जय महेश शुगर्स माजलगाव ३ लाख मे टन, समृद्धी व घृशनेश्वर शुगर्स २ लाख मे. टन व शरद शुगर्स पैठणने ४० हजार मे. टन याप्रमाणे उसाचे गाळप करावे, असे उद्दिष्ट देण्यात आले.

तोड यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे

उद्दिष्ट निश्चित झाले मात्र प्रत्यक्ष तोड यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश किती कारखाने पाळतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्यक्षात केवळ बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड कन्नड येथील कारखान्याची यंत्रणा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कारखान्याच्या ५५ टोळ्या असून, ७० ट्रकमार्फत दररोज बाराशे मेट्रिक टन ऊस गाळपासाठी घेऊन जात आहे.