शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रोहित्रासाठी आक्रमक ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांना गावातच थांबवून ठेवले

By शिवाजी कदम | Updated: July 20, 2023 14:06 IST

उडवाउडवीचीउत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या सरपंचासह ग्रामस्थांनी घेराव घातला.

तळणी : मंठ्याकडून देवठाणाकडे जाणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना उस्वद ग्रामस्थांनी अडवून ठेवले. जो पर्यंत नादुरुस्त रोहित्र बदलून मिळणार नाही. तोपर्यंत जाऊ देणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. ही घटना २० जूलै गुरवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान उस्वद बस स्टॅण्डसमोर घडली आहे.  

उस्वद येथील थ्री फेज रोहित्र २० दिवसांपासून जळालेले आहे. सरपंच संतोष सरोदे यांच्यासह ग्रामस्थांनी ९० टक्के थकबाकी महावितरणकडे भरली. मात्र, त्यानंतर महावितरणने रोहित्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अर्धेगाव अंधारात आहे. महावितरणचे कनिष्ठ अभियंता ए. एम.जंगम हे इतर कामासाठी देवठाणा गावाकडे जात असताना उस्वद ग्रामस्थांनी रोहीत्र देण्याची मागणी केली. मात्र, अभियंता जंगम यांनी उडवाउडवीचीउत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या सरपंचासह ग्रामस्थांनी घेराव घातला. जोपर्यंत रोहित्र मिळणार नाही तोपर्यंत इतर कामे करू नये. असे म्हणत अभियंत्यांना घेराव घातला. एक तासानंतरही अभियंत्यांना गावात थांबवून ठेवण्यात आले आहे.  

नादुरुस्त रोहित्र बदलून द्यावे ...उस्वद येथील सरपंच संतोष सरोदे म्हणाले की, अनेक वेळा नादुरुस्त रोहित्र बदलून देण्याची विनंती  केली. मात्र, याकडे कनिष्ठ अभियंत्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे अभियंत्यांना उस्वद येथे सन्मानपूर्वक उपहारगृहात बसून ठेवले आहे. जळालेले रोहित्र जोपर्यंत बदलून देणार नाही. तोपर्यंत त्यांना जाऊ देणार नाही. असा प्रवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. 

घटनास्थळाकडे पोलीस रवाना ...या संदर्भात कनिष्ठ अभियंता एम.जंगम यांनी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली आहे. घटनास्थळाकडे पोलीस रवाना झाले आहेत.

टॅग्स :Jalanaजालनाmahavitaranमहावितरण