शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

रोहित्रासाठी आक्रमक ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांना गावातच थांबवून ठेवले

By शिवाजी कदम | Updated: July 20, 2023 14:06 IST

उडवाउडवीचीउत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या सरपंचासह ग्रामस्थांनी घेराव घातला.

तळणी : मंठ्याकडून देवठाणाकडे जाणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना उस्वद ग्रामस्थांनी अडवून ठेवले. जो पर्यंत नादुरुस्त रोहित्र बदलून मिळणार नाही. तोपर्यंत जाऊ देणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. ही घटना २० जूलै गुरवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान उस्वद बस स्टॅण्डसमोर घडली आहे.  

उस्वद येथील थ्री फेज रोहित्र २० दिवसांपासून जळालेले आहे. सरपंच संतोष सरोदे यांच्यासह ग्रामस्थांनी ९० टक्के थकबाकी महावितरणकडे भरली. मात्र, त्यानंतर महावितरणने रोहित्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अर्धेगाव अंधारात आहे. महावितरणचे कनिष्ठ अभियंता ए. एम.जंगम हे इतर कामासाठी देवठाणा गावाकडे जात असताना उस्वद ग्रामस्थांनी रोहीत्र देण्याची मागणी केली. मात्र, अभियंता जंगम यांनी उडवाउडवीचीउत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या सरपंचासह ग्रामस्थांनी घेराव घातला. जोपर्यंत रोहित्र मिळणार नाही तोपर्यंत इतर कामे करू नये. असे म्हणत अभियंत्यांना घेराव घातला. एक तासानंतरही अभियंत्यांना गावात थांबवून ठेवण्यात आले आहे.  

नादुरुस्त रोहित्र बदलून द्यावे ...उस्वद येथील सरपंच संतोष सरोदे म्हणाले की, अनेक वेळा नादुरुस्त रोहित्र बदलून देण्याची विनंती  केली. मात्र, याकडे कनिष्ठ अभियंत्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे अभियंत्यांना उस्वद येथे सन्मानपूर्वक उपहारगृहात बसून ठेवले आहे. जळालेले रोहित्र जोपर्यंत बदलून देणार नाही. तोपर्यंत त्यांना जाऊ देणार नाही. असा प्रवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. 

घटनास्थळाकडे पोलीस रवाना ...या संदर्भात कनिष्ठ अभियंता एम.जंगम यांनी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली आहे. घटनास्थळाकडे पोलीस रवाना झाले आहेत.

टॅग्स :Jalanaजालनाmahavitaranमहावितरण