शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

लोकसभा निवडणूक निकलानंतर जि.प.मध्ये सत्तांतराची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:11 IST

राज्याच्या सत्तेत गळ्यात गळे घालून फिरत असतानाच शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर जालन्यातही त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्याच्या सत्तेत गळ्यात गळे घालून फिरत असतानाच शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर जालन्यातही त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना हे स्वतंत्र लढले. मात्र नंतर त्यांचे संख्या बळ हे बहुमताच्या जवळ होते. मात्र, शिवसेनेने भाजपच्या नेतृत्वाला धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने हातावर घड्याळ बांधले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे शिवसेनेचे अनिरूध्द खोतकर तर उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्याकडे चालून आले. भाजपचे संख्या बळ हे शिवसेनेच्या तुलनेत जास्त असल्याने भाजपने अध्यक्षपदावर दावा केला होता.जालना जिल्हा परिषदेत काही मोजका काळ वगळता शिवेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यातही अनिरूध्द खोतकर आणि जिल्हा परिषद हे समीकरणच बनले आहे. कुठलीही जोड-तोड केली तरी अनिरूध्द खोतकर हे एक तर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष राहिले आहेत. दरम्यान, शिवसेना - भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली होती. त्यामुळे तेव्हाच शिवसेना राष्ट्रवादीचे घड्याळ हातातून काढेल असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही. मध्यंतरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. परंतु यात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मध्यस्थी केल्याने खोतकर यांनी माघार घेत, दानवेंचा प्रचार केला.आता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. दानवे हे पुन्हा विजयी होतील, या आशेवर शिवसेना आणि भाजपने जिल्हा परिषदेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. काही चमत्कार होऊन येथे कॉग्रेसला संधी मिळाल्यास महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था तरी आपल्या ताब्यात राहावी म्हणून भाजप आणि श्विसेना नेतृत्वाकडून चाचपणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी भोकरदन येथील दानवेंच्या निवासस्थानी भेट देऊन व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे. यावेळी भाजपला अध्यक्षाची संधी देऊन अनिरूध्द खोतकर हे उपाध्यक्ष पदावर समाधान मानतील, असे समीकरणही ठरल्याची जोरदार चर्चा आहे.निकालाकडे लागले जालनेकरांचे लक्ष, तर्क-वितर्कांना उधाणजस-जशी २३ मे जवळ येत आहे, तशी निकालाविषयी जोरदार चर्चा रंगत आहेत. कोणाला कुठून प्लस आणि कोणाला आघाडी मिळाली या बद्दल जो तो आपल्या परीने तर्क-वितर्क लावताना दिसून येत आहेत. पैठण, फुलंब्री बदनापूर येथे काँग्रेसला चांगले मतदान झाल्याचे बोलले जात आहे. तर जालना शहरासह विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. आता मतमोजणीला केवळ पाच दिवस शिल्लक असताना जिल्हा परिषदेतील या सत्तांतराच्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान गेल्या पाच वर्षाचा कालावधी लक्षात घेतल्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने भाजपवर प्रखर टीकेचे बाण सोडल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे आ. राजेश टोपे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची मध्यवर्ती बँकेतील युतीही सर्वश्रुत आहे. आज शिवसेनेने जिल्हा परिषदेत काँग्रेसचीही अप्रत्यक्षपणे साथ घेतलेली आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदPoliticsराजकारण