शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

जालना : मध्य प्रदेशासह अन्य जिल्ह्यात बर्ड फ्लू आजार आढळून आला आहे. शिवाय परभणी जिल्ह्यातील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. ...

जालना : मध्य प्रदेशासह अन्य जिल्ह्यात बर्ड फ्लू आजार आढळून आला आहे. शिवाय परभणी जिल्ह्यातील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सतर्कता बाळगून जिल्ह्यातील पोल्ट्री चालकांसह शेतकरी, कुक्कुटपालन करणाऱ्या नागरिकांना दक्षतेबाबत सूचना दिल्या आहेत.

सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील नव्हे देशभरातील नागरिकांची झोप उडाली आहे. त्यात आता मध्य प्रदेशासह इतर काही राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यू आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. शिवाय परभणी जिल्ह्यातही काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील कुक्कुटपालन करणाऱ्या नागरिकांसह पोल्ट्री फार्म चालकांनाही बर्ड फ्लू आजाराची लक्षणे, घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती दिली जात आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, इतर राज्यांमध्ये रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेतली जात असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. शिवाय आपल्याकडील पक्षांना कोणता आजार झाला किंवा पक्षी मयत झाला तर त्याची माहिती द्यावी, असे आवाहनही केले आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पोल्ट्री चालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. या आजाराबाबत घ्यावयाची दक्षता सांगितली जात आहे.

एखाद पक्षी आजारी असेल तर त्याला इतर पक्षापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. शिवाय परिसर निर्जंतुकीकरण करावा.

पक्षांमध्ये कोणतेही आजार दिसून येत असतील तर तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपचार घेणे गरजेचे आहे.

मृत पक्षी आढळल्यास तत्काळ कळवा

पोल्ट्री फार्मवरील किंवा आपल्या घरातील, शेतातील एखादा पक्षी मृत पावला तर त्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाला देणे गरजेचे आहे. पशुवैद्यकीय विभागातील तज्ज्ञांमार्फत मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन केले जाते. याद्वारे त्या पक्ष्याचा कोणत्या कारणाने मृत्यू झाला याची माहिती समजू शकते. त्यामुळे मृत पक्षाची माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे.

जालना जिल्ह्यात एकाही पक्षाला बर्ड फ्लूची लक्षणे दिसून आली नाहीत. शिवाय मृत पक्ष्यामध्येही त्याची लक्षणे आढळलेली नाहीत. दक्षतेबाबत आवाहन केले आहे.

- शिवाजी कुरेवाड, उपायुक्त