शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

भरीव निधी मिळाल्याने सिंचनाचा अनुशेष दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST

जालना : जालना जिल्हा हा सिंचनाच्या दृष्टीने अन्य जिल्ह्यांच्या मानाने खूप मागे आहे. हातवन हा जालना तालुक्यातील मोठा प्रकल्प ...

जालना : जालना जिल्हा हा सिंचनाच्या दृष्टीने अन्य जिल्ह्यांच्या मानाने खूप मागे आहे. हातवन हा जालना तालुक्यातील मोठा प्रकल्प आहे. यासाठी २९७ कोटी रुपये मंजूर झाल्याचे कळल्यावर हातवनसह परिसरात आंनदोत्सव साजरा करण्यात आला.

निम्न दुधना प्रकल्पानंतर हा जालना जिल्ह्यातील अत्यंत मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. २००८ मध्ये या प्रकल्पास मंजुरी मिळाली होती. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत ५७ कोटी रुपये एवढी होती. हा प्रकल्प लांबणीवर पडत गेल्याने किंमत वाढली आहे. या प्रकल्पामुळे हातवन, खणेपुरी, भाटेपुरी, कारला, यासह अन्य पंधरा ते वीस गावांना लाभ होणार आहे. हा प्रकल्प दुधना नदीवर होणार आहे. प्रकल्प मंजुरीसाठी गावकऱ्यांनी आधी नकार दर्शविला होता; परंतु अनेक नेत्यांनी मध्यस्थी करून याचे महत्त्व पटवून दिले.

एकूणच हातवण प्रकल्पासाठी येथील नागरिकांनी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता; परंतु आज हा निधी मिळणार असल्याचे माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीकांत घुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आता या प्रकल्पाचे तातडीने काम सुरू होणे गरजचेे असल्याचे घुले म्हणाले.

केंद्र सरकारकडे केला होता पाठपुरावा

हातवन येथील हा सिंचन प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी ज्याप्रमाणे पालकमंत्री राजेश टोपे यांनी प्रयत्न केले, त्याचप्रमाणे आपणही या प्रकल्पाचे महत्त्व फार आधीपासून ओळखले होते. त्यामुळे केंद्र सरकारच्या जल आयोगाकडून प्रकल्पास मंजुरी मिळावी म्हणून आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्याचप्रमाणे वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडे निधीसाठी पाठपुरावा केला. शेतकऱ्यांचे प्रकल्प होण्यासाठी मन वळविले. आज हा २९७ कोटींचा निधी मिळाल्याने मनस्वी समाधान मिळत आहे.

- अर्जुन खोतकर, माजी मंत्री