शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाºयांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:10 IST

दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये अधिकारी, कर्मचाºयांनी कुचराई न करता नागरिकांच्या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष द्यावे या कामात कुचराई केल्यास संबधीताविरुध्द कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.

ठळक मुद्देबबनराव लोणीकर : अंबड तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये अधिकारी, कर्मचाºयांनी कुचराई न करता नागरिकांच्या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष द्यावे या कामात कुचराई केल्यास संबधीताविरुध्द कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.अंबड येथे गुरुवारी लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार पासून सर्व शासकीय यंत्रणा टंचाई आढावा तसेच पाहणीच्या कामाला लागण्याचे आदेश पालकमंत्री लोणीकर यांनी बैठकीत दिले.टंचाईच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील चारा इतर जिल्हयांमध्ये नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा घटनावर अंकुश ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहे.जनावरांना लागणारा चारा व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी शासन सर्व स्तरांवर प्रयत्न करत आहे. संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी शेतकºयांनी आपल्या शेतात तीन महिन्यात उत्पादीत होणारा मका, जयवंत, यशवंत तसेच अफ्रिकन गवत आदी प्रकारची चाºयाची लागवड करण्याचे आवाहन यावेळी लोणीकर यांनी केले. यासाठी शासन शेतकºयांना सर्वतोपरी सहाय्य करणार आहे. धरणाचे पाणी, साठवण तलाव, लघुतलाव, भरण आदीव्दारे पाणी उपलब्ध होत असेल तर शेतकºयांनी त्याचा लाभ घ्यावा. शेतकºयांचे वीजबिलाच्या थकीत रकमेसाठी शेतकºयांचा वीज पुरवठा खंडित करु नये अशा सूचना महावितरण अधिकाºयांना लोणीकर यांनी दिली. वेळ पडल्यास शेतकºयांनी निर्मिती केलेला चारा सरकार खरेदी करेल, सरकार शेतकºयांकडून खरेदी केलेला चारा टंचाई ग्रस्त गावांना पुरविणार आहे. यामुळे शेतकºयांनी सुध्दा याकडे लक्ष द्यावे असे लोणीकर यांनी सांगितले. जिल्हयात ६९ टक्के शेतकºयांना कर्जवाटप करण्यात आले आहे, सरकार सर्व शेतकºयांना लवकरात लवकर कर्ज मिळावे या भूमिकेत असतानाही केवळ काही बँकांचा आडमुठेपणा धोरणामुळे शेतकºयांना कर्जपुरवठा होण्यास अडचणी येत असल्याच्या शेतकºयाच्या तक्रारी आहे. यावर बँकाना सूचना दिल्या.

टॅग्स :JalanaजालनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकर