शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

वॉटरग्रीडच्या कामात हयगय केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:47 IST

जालना, परतूर व मंठा तालुक्यातील १७६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या वॉटरग्रीड योजनेअंतर्गत पाइप अंथरण्याची कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना :जालना, परतूर व मंठा तालुक्यातील १७६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या वॉटरग्रीड योजनेअंतर्गत पाइप अंथरण्याची कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. या कामात दिरंगाई करणा-या अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.वॉटरग्रीड योजनेच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत या योजनेच्या कामासाठी २३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, काही निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च झाला आहे. पावसाळयामध्ये शेती मशागतीची कामे सुरु होत असल्याने पाईपलाईन अंथरण्यासाठी खोदकाम करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत पाईपलाईन अंथरण्याचे काम जूनपूर्वी करण्यात यावे. या योजनेंतर्गत झालेल्या कामांची तपासणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे यांच्या गुणवत्ता पथक तसेच उस्मानाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत करण्यात येणार आहे. गुणवत्ता पथकाने दर्शविलेल्या त्रूटींची पूर्तता तातडीने करण्याचे निर्देश देत ही कामे गुणवत्तापूर्णच झाली पाहिजेत, अशा सूचनाही लोणीकर यांनी बैठकीत दिल्या. या वेळी गुणवत्ता पथकातील अधिका-यांनी योजनेच्या कामासंदर्भात उपयुक्त सूचना मांडल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता लोलापोड, ठाणे येथील गुणवत्ता पथकाती ल अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे, गुणवत्ता पथकाचे कार्यकारी अभियंता भालेराव, निम्न दुधना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बनसोडे, परतूरचे उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील उपअभियंता कानडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकर