शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

वॉटरग्रीडच्या कामात हयगय केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:47 IST

जालना, परतूर व मंठा तालुक्यातील १७६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या वॉटरग्रीड योजनेअंतर्गत पाइप अंथरण्याची कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना :जालना, परतूर व मंठा तालुक्यातील १७६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या वॉटरग्रीड योजनेअंतर्गत पाइप अंथरण्याची कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. या कामात दिरंगाई करणा-या अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.वॉटरग्रीड योजनेच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत या योजनेच्या कामासाठी २३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, काही निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च झाला आहे. पावसाळयामध्ये शेती मशागतीची कामे सुरु होत असल्याने पाईपलाईन अंथरण्यासाठी खोदकाम करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत पाईपलाईन अंथरण्याचे काम जूनपूर्वी करण्यात यावे. या योजनेंतर्गत झालेल्या कामांची तपासणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे यांच्या गुणवत्ता पथक तसेच उस्मानाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत करण्यात येणार आहे. गुणवत्ता पथकाने दर्शविलेल्या त्रूटींची पूर्तता तातडीने करण्याचे निर्देश देत ही कामे गुणवत्तापूर्णच झाली पाहिजेत, अशा सूचनाही लोणीकर यांनी बैठकीत दिल्या. या वेळी गुणवत्ता पथकातील अधिका-यांनी योजनेच्या कामासंदर्भात उपयुक्त सूचना मांडल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता लोलापोड, ठाणे येथील गुणवत्ता पथकाती ल अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे, गुणवत्ता पथकाचे कार्यकारी अभियंता भालेराव, निम्न दुधना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बनसोडे, परतूरचे उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील उपअभियंता कानडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकर