शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

४७ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात : सुदैवाने जीवितहानी नाही

By दिपक ढोले  | Updated: July 2, 2023 19:25 IST

या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूळ यांनी दिली.

जालना : अचानक ब्रेक लाइनर जाम झाल्याने ४७ प्रवासी घेऊन जाणारी बस रस्त्याच्या खाली गेल्याची घटना जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूळ यांनी दिली.

कळमनुरी ते पुणे ही बस (एमएच.२०.बीए.२६९८) कळमनुरीहून जालन्याकडे दुपारी दोन वाजेच्या सुमारास येत होती. जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात असलेल्या वन विभागाच्या परिसरात अचानक ब्रेक लाइनर जाम झाले. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली गेली. चालकाने प्रसंगावधान राखत बसला जागेवरच थांबविले. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती बसचालकाने दिली आहे.

दरम्यान, शनिवारी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे खासगी बसला अपघात होऊन २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतरच जालना येथे बसला अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे.