शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

शेतकरी विमा अपघात योजनेलाच अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST

जालना : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी गेल्या वर्षभरात १२० प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले होते. ...

जालना : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी गेल्या वर्षभरात १२० प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ३६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे, तर २० प्रस्ताव विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. अद्यापही ६४ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा दिला जातो. यासाठी दरवर्षी कृषी विभागाकडून प्रस्ताव मागविले जातात. कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. त्यानुसार जालना जिल्ह्यात मागील वर्षभरात १२० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ ३६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

सर्वाधिक प्रकरणे रस्ता अपघाताची

जालना जिल्ह्यात वर्षभरात १२० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यातील सर्वाधिक ११ शेतकऱ्यांचा अपघातामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर पाण्यात बुडून १०, सर्पदंशाने ४ तर विजेचा धक्का लागून ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

कोणाला किती मिळते मदत

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत २ लाख रुपयांची मदत दिली जाते, तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते.

२०२० साली मंजूर झालेले प्रस्ताव

रस्ता अपघात, वाहन अपघात ११

विजेचा धक्का ५

सर्पदंश ४

बुडून किंवा उंचावरून पडून १०

या अपघातामुळे दिला जातो विमा

शेतकऱ्याचा रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून, सर्पदंश, विंचू दंश, खून, उंचावरून पडून मृत्यू झाल्यास विमा दिला जातो. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.