शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विमा अपघात योजनेलाच अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST

जालना : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी गेल्या वर्षभरात १२० प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले होते. ...

जालना : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी गेल्या वर्षभरात १२० प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ३६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे, तर २० प्रस्ताव विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. अद्यापही ६४ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा दिला जातो. यासाठी दरवर्षी कृषी विभागाकडून प्रस्ताव मागविले जातात. कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. त्यानुसार जालना जिल्ह्यात मागील वर्षभरात १२० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ ३६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

सर्वाधिक प्रकरणे रस्ता अपघाताची

जालना जिल्ह्यात वर्षभरात १२० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यातील सर्वाधिक ११ शेतकऱ्यांचा अपघातामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर पाण्यात बुडून १०, सर्पदंशाने ४ तर विजेचा धक्का लागून ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

कोणाला किती मिळते मदत

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत २ लाख रुपयांची मदत दिली जाते, तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते.

२०२० साली मंजूर झालेले प्रस्ताव

रस्ता अपघात, वाहन अपघात ११

विजेचा धक्का ५

सर्पदंश ४

बुडून किंवा उंचावरून पडून १०

या अपघातामुळे दिला जातो विमा

शेतकऱ्याचा रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून, सर्पदंश, विंचू दंश, खून, उंचावरून पडून मृत्यू झाल्यास विमा दिला जातो. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.