शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

शेतकरी विमा अपघात योजनेलाच अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST

जालना : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी गेल्या वर्षभरात १२० प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले होते. ...

जालना : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी गेल्या वर्षभरात १२० प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ३६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे, तर २० प्रस्ताव विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. अद्यापही ६४ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा दिला जातो. यासाठी दरवर्षी कृषी विभागाकडून प्रस्ताव मागविले जातात. कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. त्यानुसार जालना जिल्ह्यात मागील वर्षभरात १२० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ ३६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

सर्वाधिक प्रकरणे रस्ता अपघाताची

जालना जिल्ह्यात वर्षभरात १२० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यातील सर्वाधिक ११ शेतकऱ्यांचा अपघातामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर पाण्यात बुडून १०, सर्पदंशाने ४ तर विजेचा धक्का लागून ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

कोणाला किती मिळते मदत

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत २ लाख रुपयांची मदत दिली जाते, तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते.

२०२० साली मंजूर झालेले प्रस्ताव

रस्ता अपघात, वाहन अपघात ११

विजेचा धक्का ५

सर्पदंश ४

बुडून किंवा उंचावरून पडून १०

या अपघातामुळे दिला जातो विमा

शेतकऱ्याचा रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून, सर्पदंश, विंचू दंश, खून, उंचावरून पडून मृत्यू झाल्यास विमा दिला जातो. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.