शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आजुबाईच्या स्वारीचा शनिवारी आन्वा येथे सोहळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:39 IST

भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आन्वा येथील जगदंबा आजुबाईची स्वारी शुक्रवारी मध्यरात्री निघणार आहे.

हुसेन पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कआन्वा : भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आन्वा येथील जगदंबा आजुबाईची स्वारी शुक्रवारी मध्यरात्री निघणार आहे. मागील १५ वर्षापासून प. पू. सोनू महाराज स्वारी घेतात.या यात्रेला मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक आदी ठिकाणांहून भाविक स्वारीच्या दर्शनासाठी येतात. अष्टमीस सकाळी प. पू. सोनू महाराजांना मंत्र घोषात स्नान घातले जाते. नंतर महाराज देवीच्या ध्यानस्थ होतात. रात्री १२ वाजेच्या दरम्यान गावातील भगवतीची आज्ञा घेतात. गावातील मंदिर हे आजुबाई यांचे देवस्थान आहे. आज्ञा घेतल्यावर अपूर्व संचारात ते श्री आजुबाई देवीचे वस्त्र परिधान करतात. यानंतर देवीला आरसा दाखवून स्वरूप दर्शन घडविले जाते. व स्वारी निघते. दरम्यान गावातील मंदिरात भाविक पोता ऊजळतात. भक्तगण नवसाच्या पोता कबूल करून पोता खेळतात.दरम्यान पोतांचा प्रकाश पसरतो. वाद्यांचा गजर होतो. जनसमुदाय भक्तिभावात रंगून जातो. धर्म, वंश, वय, जात यांच्या पलीकडे गेलेले आजुबाईचे भक्त आजुबाईचा जयजयकार करतात. याच दरम्यान आजुबाईची स्वारी निघते. जयघोषाच्या निनादात स्वारी गावातील मंदिरात जाते. तेथे शस्त्रधारण विधी होतो. नंतर स्वारी शांत होते. प. पू. सोनू महाराजांचे आजुबाई स्वरूपातील दर्शन करून भक्तगण घराकडे जातात.स्वारीचीआख्यायिकाशके १४९४ चैत्र शु. चतुर्थीस श्री. क्षेत्र आन्वा येथे तुकारामपंत व चंद्रिकाबाई यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवती तुळजा भवानीने अवतार धारण केला. पाच वर्षाच्या अवतार कार्यात जगदंबा आजुबाईने राजापासून रंकापर्यंत अनेकांचे दु:ख निवारण केले. व दीन, पीडितांचा उद्धार करुन लोकांना भक्तीच्या मार्गास लावले. यामुळे जगदंबेची ख्याती सर्वदूर पसरुन भक्तांची रीघ लागली. भगवतीने तूकारामपंतांना पुत्र- प्राप्तीचे वरदान देऊन अंतर्धान होण्याचे ठरविले. त्यामुळे सर्वजण दु:खात बुडाले व जगदंबेच्या दर्शनास आपण अंतरणार हे सहन न होऊन ते भगवतीची प्रार्थना करू लागले की, माते तुझ्या दर्शनापासून आम्हास दूर नको ठेवू. तू आम्हास सोडून जाऊ नकोस. यावेळी आजुबाईने नागरिकांचे सांत्वन करताना सांगितले की, दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीस माझ्या वंशातील पुरुष माझी स्वारी घेईल व त्यावेळी मी त्यांच्याद्वारे सर्वांना दर्शन देईन. सर्वांच्या मनोकामना त्यातून पूर्ण होतील. असे अभिवचन देऊन भगवती आजुबाई अंतर्धान पावली. त्यानंतर तुकारामपंतांनी चैत्र शुद्ध अष्टमीस वस्त्र परिधान करून स्वारी घेतली व भगवतीने आपल्या वचनाप्रमाणे सर्वांना दर्शन दिले. तेव्हापासून आजपर्यंत श्री आजुबाई देवीची स्वारीची परंपरा वंश परंपरेने सुरू आहे. सध्या प. पू. श्री. सोनू महाराज २००४ पासून स्वारी घेत आहेत. या पूर्वी १९६२ पासून सदगुरू लक्ष्मीकांत महाराज स्वारी घेत असत. सदगुरू लक्ष्मीकांत हे ब्रह्मज्ञानी तपस्वी, आजन्म ब्रह्मचारी व संपूर्ण जीवन आजुबाई चरणी वाहिलेले परमपुरूष होते. त्यांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही पसरलेला आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम