शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

आजुबाईच्या स्वारीचा शनिवारी आन्वा येथे सोहळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:39 IST

भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आन्वा येथील जगदंबा आजुबाईची स्वारी शुक्रवारी मध्यरात्री निघणार आहे.

हुसेन पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कआन्वा : भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आन्वा येथील जगदंबा आजुबाईची स्वारी शुक्रवारी मध्यरात्री निघणार आहे. मागील १५ वर्षापासून प. पू. सोनू महाराज स्वारी घेतात.या यात्रेला मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक आदी ठिकाणांहून भाविक स्वारीच्या दर्शनासाठी येतात. अष्टमीस सकाळी प. पू. सोनू महाराजांना मंत्र घोषात स्नान घातले जाते. नंतर महाराज देवीच्या ध्यानस्थ होतात. रात्री १२ वाजेच्या दरम्यान गावातील भगवतीची आज्ञा घेतात. गावातील मंदिर हे आजुबाई यांचे देवस्थान आहे. आज्ञा घेतल्यावर अपूर्व संचारात ते श्री आजुबाई देवीचे वस्त्र परिधान करतात. यानंतर देवीला आरसा दाखवून स्वरूप दर्शन घडविले जाते. व स्वारी निघते. दरम्यान गावातील मंदिरात भाविक पोता ऊजळतात. भक्तगण नवसाच्या पोता कबूल करून पोता खेळतात.दरम्यान पोतांचा प्रकाश पसरतो. वाद्यांचा गजर होतो. जनसमुदाय भक्तिभावात रंगून जातो. धर्म, वंश, वय, जात यांच्या पलीकडे गेलेले आजुबाईचे भक्त आजुबाईचा जयजयकार करतात. याच दरम्यान आजुबाईची स्वारी निघते. जयघोषाच्या निनादात स्वारी गावातील मंदिरात जाते. तेथे शस्त्रधारण विधी होतो. नंतर स्वारी शांत होते. प. पू. सोनू महाराजांचे आजुबाई स्वरूपातील दर्शन करून भक्तगण घराकडे जातात.स्वारीचीआख्यायिकाशके १४९४ चैत्र शु. चतुर्थीस श्री. क्षेत्र आन्वा येथे तुकारामपंत व चंद्रिकाबाई यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवती तुळजा भवानीने अवतार धारण केला. पाच वर्षाच्या अवतार कार्यात जगदंबा आजुबाईने राजापासून रंकापर्यंत अनेकांचे दु:ख निवारण केले. व दीन, पीडितांचा उद्धार करुन लोकांना भक्तीच्या मार्गास लावले. यामुळे जगदंबेची ख्याती सर्वदूर पसरुन भक्तांची रीघ लागली. भगवतीने तूकारामपंतांना पुत्र- प्राप्तीचे वरदान देऊन अंतर्धान होण्याचे ठरविले. त्यामुळे सर्वजण दु:खात बुडाले व जगदंबेच्या दर्शनास आपण अंतरणार हे सहन न होऊन ते भगवतीची प्रार्थना करू लागले की, माते तुझ्या दर्शनापासून आम्हास दूर नको ठेवू. तू आम्हास सोडून जाऊ नकोस. यावेळी आजुबाईने नागरिकांचे सांत्वन करताना सांगितले की, दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीस माझ्या वंशातील पुरुष माझी स्वारी घेईल व त्यावेळी मी त्यांच्याद्वारे सर्वांना दर्शन देईन. सर्वांच्या मनोकामना त्यातून पूर्ण होतील. असे अभिवचन देऊन भगवती आजुबाई अंतर्धान पावली. त्यानंतर तुकारामपंतांनी चैत्र शुद्ध अष्टमीस वस्त्र परिधान करून स्वारी घेतली व भगवतीने आपल्या वचनाप्रमाणे सर्वांना दर्शन दिले. तेव्हापासून आजपर्यंत श्री आजुबाई देवीची स्वारीची परंपरा वंश परंपरेने सुरू आहे. सध्या प. पू. श्री. सोनू महाराज २००४ पासून स्वारी घेत आहेत. या पूर्वी १९६२ पासून सदगुरू लक्ष्मीकांत महाराज स्वारी घेत असत. सदगुरू लक्ष्मीकांत हे ब्रह्मज्ञानी तपस्वी, आजन्म ब्रह्मचारी व संपूर्ण जीवन आजुबाई चरणी वाहिलेले परमपुरूष होते. त्यांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही पसरलेला आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम