शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

‘जलयुक्त’च्या अडीच हजार कामांसाठी ९४ कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:08 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात (वर्ष २०१७-१८) जिल्ह्यातील १४९ गावांमध्ये दोन हजार ५५३ कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे गावनिहाय आराखडे तयार करण्यात आले

बाबासाहेब म्हस्के/जालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात (वर्ष २०१७-१८) जिल्ह्यातील १४९ गावांमध्ये दोन हजार ५५३ कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे गावनिहाय आराखडे तयार करण्यात आले असून, यासाठी ९३ कोटी ४८ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जालना तालुक्यातील २२ गावांमध्ये सर्वाधिक ४१५ कामे केली जाणार आहे.सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र हा उद्देश समोर ठेवून राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. अभियानांतर्गत माथा ते पायथा या पद्धतीने करावयाच्या सिमेंट नालाबांध, बांधबंदिस्ती, नाला खोलीकरण-रुंदीकरण, गाळ काढणे, लगत समतल चर खोदणे आदी कामांना ग्रामसभेची मंजुरी घेऊन गावनिहाय कामांचे आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व १४९ गावांत जलयुक्त शिवार अभियानातून करावयाच्या कामांवर ग्रामसभेत चर्चा करून कामांचा आराखडा अंतिम करण्यात आला. जलयुक्तच्या कामांच्या या आराखड्यांना जिल्हाधिका-यांची मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार जालना तालुक्यात सर्वाधिक ४१५ कामे केली जाणार असून, यासाठी ११. ९४ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. बदनापूर तालुक्यातील १५ गावांमध्ये ३५६ तर भोकरदन तालुक्यातील २५ गावांमध्ये ३८२ कामे केली जाणार आहे. मंठा तालुक्यात सर्वात कमी २०२ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात तिसºया टप्प्यात करावयाच्या दोन हजार ५५३ कामांसाठी एकूण ९३ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे जिल्हा जलयुक्त शिवार अभियान समितीचे सदस्य सचिव दशरथ तांभाळे यांनी सांगितले.------------कंत्राटदारांना निकष वाटताहेत अडचणींचेजलयुक्त शिवार अभियानांतर्गत केली जाणारी कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने व गुणवत्तापूर्वक व्हावीत, यासाठी शासनाने विविध निकष तयार केले आहेत. निकषांनुसारच कामे करण्यास सर्व विभागांनी कामे करावीत, यासाठी शासन आग्रही आहे. मात्र गुणवत्तेचे हे निकष प्रत्यक्षात काम करणा-या कंत्राटदारांना गुंतागुंतीचे वाटत आहेत. परिणामी जलयुक्तच्या कामांकडे अनेकांनी पाठ फिरवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.