शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’च्या अडीच हजार कामांसाठी ९४ कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:08 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात (वर्ष २०१७-१८) जिल्ह्यातील १४९ गावांमध्ये दोन हजार ५५३ कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे गावनिहाय आराखडे तयार करण्यात आले

बाबासाहेब म्हस्के/जालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात (वर्ष २०१७-१८) जिल्ह्यातील १४९ गावांमध्ये दोन हजार ५५३ कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे गावनिहाय आराखडे तयार करण्यात आले असून, यासाठी ९३ कोटी ४८ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जालना तालुक्यातील २२ गावांमध्ये सर्वाधिक ४१५ कामे केली जाणार आहे.सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र हा उद्देश समोर ठेवून राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. अभियानांतर्गत माथा ते पायथा या पद्धतीने करावयाच्या सिमेंट नालाबांध, बांधबंदिस्ती, नाला खोलीकरण-रुंदीकरण, गाळ काढणे, लगत समतल चर खोदणे आदी कामांना ग्रामसभेची मंजुरी घेऊन गावनिहाय कामांचे आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व १४९ गावांत जलयुक्त शिवार अभियानातून करावयाच्या कामांवर ग्रामसभेत चर्चा करून कामांचा आराखडा अंतिम करण्यात आला. जलयुक्तच्या कामांच्या या आराखड्यांना जिल्हाधिका-यांची मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार जालना तालुक्यात सर्वाधिक ४१५ कामे केली जाणार असून, यासाठी ११. ९४ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. बदनापूर तालुक्यातील १५ गावांमध्ये ३५६ तर भोकरदन तालुक्यातील २५ गावांमध्ये ३८२ कामे केली जाणार आहे. मंठा तालुक्यात सर्वात कमी २०२ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात तिसºया टप्प्यात करावयाच्या दोन हजार ५५३ कामांसाठी एकूण ९३ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे जिल्हा जलयुक्त शिवार अभियान समितीचे सदस्य सचिव दशरथ तांभाळे यांनी सांगितले.------------कंत्राटदारांना निकष वाटताहेत अडचणींचेजलयुक्त शिवार अभियानांतर्गत केली जाणारी कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने व गुणवत्तापूर्वक व्हावीत, यासाठी शासनाने विविध निकष तयार केले आहेत. निकषांनुसारच कामे करण्यास सर्व विभागांनी कामे करावीत, यासाठी शासन आग्रही आहे. मात्र गुणवत्तेचे हे निकष प्रत्यक्षात काम करणा-या कंत्राटदारांना गुंतागुंतीचे वाटत आहेत. परिणामी जलयुक्तच्या कामांकडे अनेकांनी पाठ फिरवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.