शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

२१६ जागांसाठी ६९५ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST

परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या ३१६ जागांसाठी ६९५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. परतूर तालुक्यात कार्यकाळ संपलेल्या ३८ ग्रामपंचायतींच्या ...

परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या ३१६ जागांसाठी ६९५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

परतूर तालुक्यात कार्यकाळ संपलेल्या ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात राजकीय धुराळा उडाला आहे. आपली ग्रामपंचायत निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते मंडळी कामाला लागले आहेत. या निवडणुका गावपातळीवरील प्रश्नावर व वैयक्तिक हेव्या- दाव्यावर आधारित असतात. त्यामुळे प्रत्येक गावात चुरस निर्माण झाली आहे. ३८ ग्रामपंचायतींसाठी ३१६ जागा आहेत. यात प्रभागांची संख्या ११९ आहे. नामनिर्देशन मागे घेतल्यानंतर ६९५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूणच या निवडणुका अटी- तटीच्या होत असल्याने प्रचारातही चुरस वाढली आहे.

बिनविरोधमध्ये महिलांची बाजी

परतूर तालुक्यातील ७ ग्रामपंचातींमध्ये १३ सदस्य बिनविरोध निवडल्या गेले आहेत. यामध्ये मसला ग्रमापंचायतीतील ३, लिखित पिंप्री ३, वाहेगाव सातारा ३, तर लिंगसा, हनवडी/गणेशपूर/तोरणा, परतवाडी, वलखेड या ग्रामपंचायतीतीतून प्रत्येकी एक सदस्य निवडला गेला आहे. यामध्ये महिलांनी बाजी मारली आहे. यात १३ पैकी ८ महिला सदस्य बिनविरोध निवडून आल्या आहेत.