शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

मंजुरी न मिळाल्याने ६५० लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, असे असतानाही अद्याप शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, असे असतानाही अद्याप शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६५० लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाने तातडीने या योजनेला मंजुरी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्याच्या कृषी विभागामार्फत सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुसूचित जाती - जमातीतील शेतकऱ्यांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजना’ जिल्हा परिषदेंतर्गत राबविण्यात येतात. या योजनांतर्गत सिंचन विहीर पॅकेज, नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, वीजजोडणी, पंप संच, सूक्ष्म सिंचन संच, शेततळ्याचे प्लास्टिक यासाठी अनुदान दिले जाते.

दरम्यान, योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून दरवर्षी मंजुरी दिली जाते. यावर्षी शासनाने केवळ ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ व ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना’ यांनाच मंजुरी दिली असून, त्यानुसार लाभार्थ्यांकडून शासन अर्ज मागवत आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, अद्यापही शासनाने ‘डॉ. बाबासाहेब आंबडेकर कृषी स्वावलंबन योजने’ला मंजुरी दिलेली नाहीे. यासाठी १९ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे; परंतु, योजनेला मंजुरी न मिळाल्याने ६५० लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.

शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला अद्याप मंजुरी दिलेली नाही. आर्थिक वर्ष संपण्याला केवळ तीन महिने शिल्लक आहेत. लाभार्थी निवडण्यासाठी कालावधी लागतो. त्यामुळे जवळपास ६५० लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी १९ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे.

भीमराव रणदिवे, जिल्हा कृषी विकास अधिकारी.