शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

मंजुरी न मिळाल्याने ६५० लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, असे असतानाही अद्याप शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, असे असतानाही अद्याप शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६५० लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाने तातडीने या योजनेला मंजुरी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्याच्या कृषी विभागामार्फत सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुसूचित जाती - जमातीतील शेतकऱ्यांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजना’ जिल्हा परिषदेंतर्गत राबविण्यात येतात. या योजनांतर्गत सिंचन विहीर पॅकेज, नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, वीजजोडणी, पंप संच, सूक्ष्म सिंचन संच, शेततळ्याचे प्लास्टिक यासाठी अनुदान दिले जाते.

दरम्यान, योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून दरवर्षी मंजुरी दिली जाते. यावर्षी शासनाने केवळ ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ व ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना’ यांनाच मंजुरी दिली असून, त्यानुसार लाभार्थ्यांकडून शासन अर्ज मागवत आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, अद्यापही शासनाने ‘डॉ. बाबासाहेब आंबडेकर कृषी स्वावलंबन योजने’ला मंजुरी दिलेली नाहीे. यासाठी १९ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे; परंतु, योजनेला मंजुरी न मिळाल्याने ६५० लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.

शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला अद्याप मंजुरी दिलेली नाही. आर्थिक वर्ष संपण्याला केवळ तीन महिने शिल्लक आहेत. लाभार्थी निवडण्यासाठी कालावधी लागतो. त्यामुळे जवळपास ६५० लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी १९ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे.

भीमराव रणदिवे, जिल्हा कृषी विकास अधिकारी.