शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

मंजुरी न मिळाल्याने ६५० लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, असे असतानाही अद्याप शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, असे असतानाही अद्याप शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६५० लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाने तातडीने या योजनेला मंजुरी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्याच्या कृषी विभागामार्फत सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुसूचित जाती - जमातीतील शेतकऱ्यांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजना’ जिल्हा परिषदेंतर्गत राबविण्यात येतात. या योजनांतर्गत सिंचन विहीर पॅकेज, नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, वीजजोडणी, पंप संच, सूक्ष्म सिंचन संच, शेततळ्याचे प्लास्टिक यासाठी अनुदान दिले जाते.

दरम्यान, योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून दरवर्षी मंजुरी दिली जाते. यावर्षी शासनाने केवळ ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ व ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना’ यांनाच मंजुरी दिली असून, त्यानुसार लाभार्थ्यांकडून शासन अर्ज मागवत आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, अद्यापही शासनाने ‘डॉ. बाबासाहेब आंबडेकर कृषी स्वावलंबन योजने’ला मंजुरी दिलेली नाहीे. यासाठी १९ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे; परंतु, योजनेला मंजुरी न मिळाल्याने ६५० लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.

शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला अद्याप मंजुरी दिलेली नाही. आर्थिक वर्ष संपण्याला केवळ तीन महिने शिल्लक आहेत. लाभार्थी निवडण्यासाठी कालावधी लागतो. त्यामुळे जवळपास ६५० लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी १९ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे.

भीमराव रणदिवे, जिल्हा कृषी विकास अधिकारी.