शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

६० धार्मिक स्थळे हटवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:01 IST

जालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुुरुवारी चौथ्या दिवशीही सुरूच होती. आतापर्यंत ६० हून अधिक धार्मिक स्थळे ...

जालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुुरुवारी चौथ्या दिवशीही सुरूच होती. आतापर्यंत ६० हून अधिक धार्मिक स्थळे हटविण्यात आली असून, धार्मिक स्थळांना लागून असलेली अवैध दुकानेही जमीनदोस्त करण्यात येत आहेत.गुरुवारी सकाळी भोकरदन नाका परिसरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली. यामुळे जालना-औरंगाबाद रस्त्यावरील बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक भोकरदन नाक्याहून संभाजीनगरमार्गे वळविण्यात आली होती. भोकरदन नाका परिसरातील दर्गा नसरुल्लाशाह कादरी परिसरातील काही कबरीही कारवाईत हटविण्यात आल्या. तसेच रस्त्यावर येत असलेली काही दुकानेही पाडण्यात आली. कारवाईच्या भीतीने काही नागरिकांनी रस्त्यावर येणारी आपली दुकाने स्वत:हून काढून घेतली. दुपारी दोन वाजेपर्यंत येथील कारवाई सुरू होती. मंठा चौफुली परिसरातील सात अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच अंबड चौफुली परिसरातील कल्पतरु अपार्टमेंट जवळील धार्मिक स्थळही हटविण्यात आले. गांधी चमन परिसरातील अतिक्रमणेही जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे कायम फळांच्या गाड्यांचा गराडा असलेला हा भाग मोकळा झाला आहे. धार्मिक स्थळांना लागून थाटण्यात आलेल्या टप-या, गॅरेज, ज्यूस, चहाविक्रीची दुकाने कारवाईत मोठ्या प्रमाणात हटविण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण ६० हून अधिक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, काही भागात अतिक्रमण हटविल्यानंतर काही नागरिक त्याच जागेवर दगडांच्या खुणा लावून पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकडे अतिक्रमण हटाव पथकाने लक्ष देण्याची गरज आहे.