शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

पीएम केअर फंडामधून जिल्ह्याला ५८ व्हेंटिलेटर्स; रुग्णांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

गेल्या वर्षभरापासून जालना जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या आणि मृत्यू वाढत असल्याने जालनेकरांची चिंता आणखी वाढली आहे. ...

गेल्या वर्षभरापासून जालना जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या आणि मृत्यू वाढत असल्याने जालनेकरांची चिंता आणखी वाढली आहे. रुग्ण गंभीर होण्याच्या प्रकारामुळे दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवून ऑक्सिजन देण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. व्हेंटिलेटरप्रमाणेच ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर हे यंत्रही महत्त्वाचे ठरत आहे. या यंत्राद्वारे हवेतून ऑक्सिजन घेऊन तो थेट रुग्णांना दिला जात आहे. व्हेंटिलेटरची संख्या मर्यादित असली तरी ते व्हेंटिलेटर सुस्थितीत असून, रुग्णांना दिलासा देत आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढल्याने सरकारने उद्योगासाठीचा ऑक्सिजन पुरवठा थांबवून तो सर्व पुरवठा केवळ रुग्णालयांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऑक्सिजनअभावी आजघडीला जिल्ह्यात रुग्णांना अडचण नसल्याचे दिसून आले. गेल्या महिन्याभरात जालना जिल्ह्याला केंद्र आणि राज्य सरकार तसेच उद्योगांच्या सीएसआर निधीमधून जवळपास शंभरपेक्षा अधिक ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर मिळाले आहेत. जालना ४५, अंबड ४५, कोविड रुग्णालय ४०, राजूर १०, परतूर, मंठा प्रत्येकी १० असे त्या ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरचे वितरण करण्यात आल्याचे जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर सांगण्यात आले. ही यंत्रे मिळाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोविड रुग्णालय

जालना येथील कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा असलेले ४० बेड आहेत. तेथे सर्व व्हेंटिलेटर सुरू असल्याचे भेट दिली असता दिसून आले.

अपुरे व्हेंटिलेटर

तालुका पातळीवर केवळ ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी दोन व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. त्यामुळे ही संख्या आणखी वाढविण्याची आवश्यकता आहे असे तेथील रुग्णस्थितीवरून दिसून आले.

कॉन्सेट्रेटरने दिलासा

जिल्ह्यातील जालन्यासह आठही ग्रामीण रुग्णालयांत ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर वितरित करण्यात आल्याने कोरोना रुग्णांना मोठी मदत झाल्याचे दिसून आले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सुरुवातीपासून ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे नियोजन केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

- अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक