शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थपुरी ग्रामपंचायत निवडणुकीतून ५७ जणांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST

तीर्थपुरी : तीर्थपुरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व सर्वपक्षीयांनी एकत्रित निर्णय घेत भरलेल्या ...

तीर्थपुरी : तीर्थपुरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व सर्वपक्षीयांनी एकत्रित निर्णय घेत भरलेल्या १७ पैकी १६ जागांसाठी भरलेले ५७ उमेदवारी अर्ज सोमवारी मागे घेण्यात आले. तर केवळ एका जागेसाठी मतदानप्रक्रिया होणार आहे.

जिल्ह्यात सर्वात मोठी असलेल्या तीर्थपुरी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होणार असल्याची पहिली उद्घोषणा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २३ डिसेंबर रोजी जाहीर केली आहे. त्याची ३० दिवसांची मुदत २१ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यातच तीर्थपुरी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे निवडणूक रद्द करण्यात यावी, असे पत्र नगरविकास खात्याने राज्य निवडणूक आयोगालाही दोन्ही वेळेस दिले होते. परंतु, निवडणूक आयोगाकडून कोणत्या प्रकारची सूचना न आल्याने निवडणूक प्रक्रिया सुरूच राहिली. त्यामुळे तीर्थपुरी या ठिकाणी दोनवेळा निवडणूक घेणे हे जनतेच्या हिताचे नाही, असा विचार करून गावातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी व ग्रामस्थांनी बैठक घेतली. बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी १७ जागांसाठी भरलेल्या १६ जागांवरील ५७ नामनिर्देशनपत्र परत घेण्यात आले. सर्वपक्षीयांनी ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेऊन नगरपंचायतीसाठी मार्ग मोकळा करून दिला आहे. केवळ वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी एका जागेसाठी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार, शिवाजी बोबडे, सरपंच शैलेंद्र पवार, अंकुश बोबडे, तात्यासाहेब चिमणे, गणेश पवार, नारायण बोबडे, रामप्रसाद बोबडे, मेहेरनाथ बोबडे, श्रीकष्ण बोबडे, रमेश बोबडे, कल्याण चिमणे, सचिन चिमने, विजय चिमने, श्रीराम गिरी, सुदाम मापारे, काकासाहेब कासार आदींनी प्रयत्न केले.

गावाच्या विकासासाठी निर्णय

तीर्थपुरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होणार आहे. गावाचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर तीर्थपुरी शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि दोन वेळेसच्या निवडणूक प्रक्रियेत ग्रामस्थांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी सर्वपक्षीयांनी हा निर्णय घेतला आहे. सर्वपक्षीयांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांमधून स्वागत केले जात आहे.