शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

५४ उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:05 IST

नगरपालिका निवडणूक लढविणाºया ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे चांगलेच महागात पडले. नगरपालिका प्रशासनाने जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन येथील ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात खळबळ तीन वर्षांकरिता बंदी 

जालना : नगरपालिका निवडणूक लढविणाºया ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे चांगलेच महागात पडले. नगरपालिका प्रशासनाने जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन येथील ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. याबाबत गॅझेटमध्ये नोंद करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.जिल्ह्यात मागील वर्षी जालना, परतूर, अंबड व भोकरदन नगरपालिकेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. नगरसेवक पदाचे स्वप्न पाहणाºया शेकडो उमेदवारांनी अर्ज भरले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला बँकेत स्वतंत्र खाते उघडून दररोज निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. असे असतानाही काही उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. अशा अनेक उमेदवारांना नगरपालिका प्रशासनामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर बहुतांश उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे खर्च सादर केला. मात्र, ५४ उमेदवारांनी वारंवार सूचना देऊनही निवडणूक खर्च सादर करण्यास टाळाटाळ केली. या सर्वांना नगरपालिका प्रशासनाने निवडणूक विभागाच्या नियमानुसार खर्च सादर न केल्यामुळे आपणास निवडणूक लढविण्यास अपात्र का ठरवू नये, या आशयाची नोटीस पाठवून आपली बाजू मांडण्यचे सांगण्यात आले होते. मात्र, संबंधित उमेदवारांनी याकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता कुठलीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरिवण्यात आले आहे.एक विद्यमान नगरसेविकाअपात्र ठरविण्यात आलेल्या ५४  उमेदवारांव्यतिरिक्त जालना नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३० मधील एका महिला नगरसेविकेनेही आपला निवडणूक खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे सदर नगरसेविकेला अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस नगरपालिका प्रशासनाने दिली आली आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांच्या दालनामध्ये मंगळवारी अंतीम सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.-----------नोटीस देऊनही बाजू मांडली नाहीनिवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक लढविणाºया प्रत्येक उमेदवाराला दररोज खर्च सादर करणे बंधनकारक आहे. पालिका निवडणुकीचा खर्च सादर न करणाºया ५४ उमेदवारांना प्रशासनाने नोटिसा दिल्या होत्या. नोटीस दिल्यानंतरही दिलेल्या वेळेत आपली बाजू न मांडणाºया उमेदवारांवर कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. - शिवाजीराव जोधंळे, जिल्हाधिकारी, जालना.