शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जिल्हा कारागृहात ५० टक्के तरूण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST

जालना : वाढलेली बेरोजगारी, अशिक्षितपणा, श्रम न करण्याची सवय, सराईत गुन्हेगारी आदी एक ना अनेक कारणांमुळे आजची युवा पिढी ...

जालना : वाढलेली बेरोजगारी, अशिक्षितपणा, श्रम न करण्याची सवय, सराईत गुन्हेगारी आदी एक ना अनेक कारणांमुळे आजची युवा पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे. कारागृहात दाखल २७१ पैकी १५३ युवक हे १८ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. एकूण कैद्यांच्या तुलनेत युवक आरोपी असण्याचे प्रमाण हे ५० टक्क्यांहूनही अधिक दिसून येत आहे.

उद्योगनगरी असलेल्या जालना शहरासह जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात गत काही वर्षात चोऱ्या, दरोडे, पिस्तूलची अवैध विक्री, अवैध दारूविक्री आदी विविध गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात कोरोनामुळे कंपन्या बंद पडल्या आणि अनेकांच्या हातचे काम गेले. त्यामुळे सराईत गुन्हेगारांप्रमाणेच नवखे गुन्हेगारही विविध गुन्ह्यात पोलिसांच्या हाती लागू लागले आहेत. गत काही वर्षात पिस्तूल विक्रीचाही पर्दाफाश झाला होता. त्यात पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये युवकांची संख्या अधिक होती.

भोकरदन पोलीस व चंदनझिरा पोलिसांनी नुकताच दुचाकी चोरीतील आरोपींना जेरबंद केले आहे. यामध्येही युवकांचेच प्रमाण अधिक दिसून येत आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली जाणाऱ्या आरोपींना जिल्हा कारागृहात दाखल केले जाते. घरफोड्यांसह इतर चोऱ्यांचे प्रमाणही वाढत असून, यात युवा आरोपींची संख्या अधिक दिसून येत आहे. कारागृहात असलेल्या आरोपींपैकी काही आरोपी हे सराईत आहेत. तर काहींवर विविध गुन्ह्यात प्रथम कारागृहात जाण्याची वेळ आली आहे.

जालना येथील जिल्हा कारागृहात एकूण २७१ कैदी आहेत. त्यात पाच शिक्षाबंदी असून, इतर सर्व कच्चे कैदी आहेत. कारागृहात येणाऱ्या कच्च्या कैद्यांची प्रारंभी कोरोना तपासणी करून त्यांना कारागृहात घेतले जात आहे. कारागृहात येणाऱ्या कैद्यांसाठी वाचनालयाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. शिवाय कॅन्टीनमधील पदार्थ हे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी मनिऑर्डरने कैद्यांच्या नावे रक्कम मागवून त्यातील पैसे खर्च केले जातात.

कारागृहात येणाऱ्या कैद्यांचे समुपदेशन करण्यावर अधीक्षक अनिता गुगुटराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष भर दिला आहे. अनेकवेळा बाहेरील तज्ज्ञांना बोलावूनही विविध विषयावर माहिती दिली जाते. कैद्यांनी गुन्हेगारीचा मार्ग सोडून लहान-सहान व्यावसाय करून जीवन जगावे याबाबतही समुपदेशन केले जाते. शिवाय वेळोवेळी आरोग्य तपासणीही करण्यात येत आहे.

पॅरोलवरील दोन कैदी बाहेर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने कैद्यांना पॅरोलवर बाहेर सोडण्यात येत होते. त्यानुसार सध्या कारागृहातील दोन कैद्यांना पॅरोलवर ४५ दिवसांसाठी सोडण्यात आले आहे. पॅरोलवर कैद्याला बाहेर सोडताना विविध अटी घालून त्याला सोडले जात असल्याचे सांगण्यात आले.

बलात्कारातील गुन्ह्याचे प्रमाण जास्त

महिला अत्याचाराच्या प्रकरणातही अनेक आरोपी या कारागृहात आहेत. विनयभंग, अत्याचाराच्या प्रकरणात येणाऱ्या युवकांचे प्रमाणही गत काही वर्षात वाढले आहे. दाखल तक्रारींचे प्रमाण गत काही वर्षात सरासरी सारखेच असल्याचे सांगण्यात येते.

महिला कैद्यांच्या संख्येत वाढ

कारागृहात येणाऱ्या महिला आरोपींची संख्या तीन वर्षांपूर्वी कमी होती. मात्र, गत तीन वर्षापासून महिला आरोपींच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या या कारागृहात २० महिला आरोपी असून, त्यातील १३ जणी गंभीर गुन्ह्यात आहेत.

पैशांसाठी काहीही करण्यास तयार...

पैसे मिळावे म्हणून शहर व परिसरातील अनेक युवक दुचाकींची चोरी करीत आहेत. अटक आरोपींमध्ये युवकांची संख्या अधिक आहे.

अनेक युवक घरफोडी, दुकानफोडीतही सक्रिय झाले आहेत. घरफोडीत पकडण्यात आलेल्या आरोपींमध्येही युवकांचीच संख्या अधिक आहे.

महिलांना विशेषत: वृद्ध महिलांना टार्गेट करून दागिने, पैसे लुटण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक युवक विना नंबरची दुचाकी वापरून महिलांचे दागिने लुटतात .