शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

५० टक्के मदतीचे वाटप; उर्वरित मदत वाटपाला मिळणार मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST

जालना : परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी ...

जालना : परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून मदत म्हणून ५२,२२७.४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यातील अर्ध्या रकमेचे यापूर्वी पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आले असून, आता दुसऱ्या टप्प्याचा निधी जिल्हा प्रशासनाला गुरुवारी मिळाला आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती करणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे जिकिरीचे बनत चालले आहे. कधी नव्हे तो गतवर्षी वेळेवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षा उंचावल्या होत्या. वेळेवर जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली. पिकांच्या वाढीप्रमाणे पाऊस येत राहिल्याने पिकेही चांगली आली होती; परंतु उडीद, मूग, सोयाबीन काढणीला येताच सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन स्तरावरून बाधित पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती. यानुसार पहिल्या टप्प्यात २६११३.७३ लाख रुपयांचे ५ लाख ५३ हजार ७६७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते; परंतु ही पहिल्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांना कमी पडली होती. यातच गुरुवारी पुन्हा २६११३.७३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला मिळाले असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.

शासन स्तरावरून मिळणारी मदत तोकडी

खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शासन स्तरावरून देण्यात येणार मदत फार तोकडी आहे. या मदतीतून पिकांवर झालेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात यावी.

- भिकनराव वराडे, शेतकरी, नळणी