शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
4
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
5
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
6
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
7
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
8
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
9
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
10
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
11
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
12
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
13
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
14
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
15
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
16
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
17
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
18
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
19
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
20
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा

५० टक्के मदतीचे वाटप; उर्वरित मदत वाटपाला मिळणार मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST

जालना : परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी ...

जालना : परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून मदत म्हणून ५२,२२७.४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यातील अर्ध्या रकमेचे यापूर्वी पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आले असून, आता दुसऱ्या टप्प्याचा निधी जिल्हा प्रशासनाला गुरुवारी मिळाला आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती करणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे जिकिरीचे बनत चालले आहे. कधी नव्हे तो गतवर्षी वेळेवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षा उंचावल्या होत्या. वेळेवर जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली. पिकांच्या वाढीप्रमाणे पाऊस येत राहिल्याने पिकेही चांगली आली होती; परंतु उडीद, मूग, सोयाबीन काढणीला येताच सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन स्तरावरून बाधित पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती. यानुसार पहिल्या टप्प्यात २६११३.७३ लाख रुपयांचे ५ लाख ५३ हजार ७६७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते; परंतु ही पहिल्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांना कमी पडली होती. यातच गुरुवारी पुन्हा २६११३.७३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला मिळाले असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.

शासन स्तरावरून मिळणारी मदत तोकडी

खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शासन स्तरावरून देण्यात येणार मदत फार तोकडी आहे. या मदतीतून पिकांवर झालेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात यावी.

- भिकनराव वराडे, शेतकरी, नळणी