शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

६४ पैकी ४५ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’च्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:32 IST

जालना : जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे ६४ पैकी तब्बल ४५ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होण्याच्या मार्गावर आले आहेत. या ...

जालना : जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे ६४ पैकी तब्बल ४५ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होण्याच्या मार्गावर आले आहेत. या प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिकचा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे; परंतु अद्यापही चार प्रकल्पांत मृत पाणीसाठा तर ८ प्रकल्पांत केवळ २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

गत आठवड्यात जिल्ह्याच्या विविध भागांत दमदार पाऊस झाला. सलग पाच-सहा दिवस पडलेल्या पावसामुळे खरिपातील पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शिवाय नदी, ओढ्यांच्या काठी असलेल्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत; परंतु दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक मात्र समाधानकारक झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४५ प्रकल्पांमध्ये ८५ टक्क्यांहून अधिकचा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यातील काही प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले असून, इतर प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होण्याच्या मार्गावर आहेत. या खालोखाल तीन प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. चार प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये तर आठ प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर अद्यापही चार प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण ७८.७० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यात मध्यम प्रकल्पांमध्ये ७३.१७ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये ८०.९५ टक्के पाणीसाठा झाला आहे. बहुतांश मध्यम प्रकल्पांमध्येही पाण्याची आवक समाधानकारक झाली आहे.

चौकट

अनेक गावांचा पाणीप्रश्न मार्गी

जिल्ह्यातील सात मध्यम आणि इतर लघु प्रकल्पांवर जिल्ह्यातील बहुतांश सर्वच शहरी, ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो. मोजके प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांमध्ये सद्य:स्थितीत समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय आगामी काळातील रबी हंगामातही पिकांना पाणी उपलब्ध होणार आहे. याचा शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती

प्रकल्प पाणीसाठा

कल्याण गिरजा, जालना १०० टक्के

कल्याण मध्यम, जालना ६०.३९ टक्के

अप्पर दुधना, बदनापूर ३०.१७ टक्के

जुई मध्यम, भोकरदन १०० टक्के

धामना मध्यम, भोकरदन १०० टक्के

जीवरेखा प्रकल्प, जाफराबाद १६.९७ टक्के

गल्हाटी प्रकल्प, अंबड १०० टक्के

फोटो