शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

४४ कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:41 IST

मंठा पंचायत समितीचा बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पंचनामा करण्यात आला. यावेळी एकूण ५५ कर्मचा-यांपैकी ४४ कर्मचारी गैरहजर आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय असणाऱ्या मंठा पंचायत समितीचा बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पंचनामा करण्यात आला. यावेळी एकूण ५५ कर्मचा-यांपैकी ४४ कर्मचारी गैरहजर आढळून आले. यातील ७ कर्मचारी दौ-यावर असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात त्याची रजिस्टरमध्ये नोंद केली नसल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे पंचायत समिती कार्यलयाचा पंचनामा होण्याची ही चौथी वेळ असून, इथल्या भोंगळ कारभाराला अद्याप सुधारला नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.विविध शासकीय कामांसाठी तालुक्यातुन शेकडो नागरिक पंचायत समिती कार्यालयास भेट देतात. एकतर हे कार्यालय शहरापासून तीन किलोमीटर दूर असल्याने सर्वसामान्य लोकांना पायपीट करावी लागते. किंवा रिक्षाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तालुक्यातील अनेक गावांत सध्या पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याने अनेक गावांचे सरपंच , सदस्य व नागरिक पंचायत समितीला कामानिमित्त भेटी देतात. कार्यालयात गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा कर्मचारी, बांधकाम व आस्थापना कर्मचारी, रोहयोसारख्या महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी नेहमी गैरहजर असतात.बुधवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी उपसभापती कल्याण खरात, दक्षता समितीचे अध्यक्ष अशोक वायाळ, पंजाब बोराडे , नागेश कुलकर्णी, सरपंच रामप्रसाद सुरनर, राम चव्हाण यांच्या उपस्थितीत कर्मचारी गैरहजर आढळल्याने कुलूप ठोकण्यात आले.यानंतर प्रभारी नायब तहसीलदार किशोर तायडे, तलाठी जी.आर. कुटे यांना बोलावून पंचासमक्ष कर्मचारी अनुपस्थित असल्याचा पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यामध्ये ४२ कर्मचा-यांपैकी ३४ कर्मचारी गैरहजर होते, तर १३ कंत्राटी कर्मचा-यांपैकी १० कर्मचारी गैरहजर होते. एकूण ५५ पैकी ४४ कर्मचारी गैरहजर आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या गैरहजर कर्मचा-यांवर काय कार्यवाही होते, याकडे मंठा वासियांचे लक्ष लागून आहे.विशेष म्हणजे यापुर्वी पंचायत समिती कार्यालयाचे तीन वेळा पंचनामे करण्यात आले. प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी गैरहजर आढळून येतात. याकडे वरिष्ठ अधिकारी वारंवार दुर्लक्ष करीत असल्यामुळे कर्मचारी आशा पंचनाम्यांना जुमानत नाहीत.पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मतदार संघातील असलेल्या या पंचायत समिती कार्यालयाचा भोंगळ कारभार सुधारणार कधी तरी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिका-यांकडून गैरहजर कर्मचा-यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष आहे.