शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

४४ कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:41 IST

मंठा पंचायत समितीचा बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पंचनामा करण्यात आला. यावेळी एकूण ५५ कर्मचा-यांपैकी ४४ कर्मचारी गैरहजर आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय असणाऱ्या मंठा पंचायत समितीचा बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पंचनामा करण्यात आला. यावेळी एकूण ५५ कर्मचा-यांपैकी ४४ कर्मचारी गैरहजर आढळून आले. यातील ७ कर्मचारी दौ-यावर असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात त्याची रजिस्टरमध्ये नोंद केली नसल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे पंचायत समिती कार्यलयाचा पंचनामा होण्याची ही चौथी वेळ असून, इथल्या भोंगळ कारभाराला अद्याप सुधारला नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.विविध शासकीय कामांसाठी तालुक्यातुन शेकडो नागरिक पंचायत समिती कार्यालयास भेट देतात. एकतर हे कार्यालय शहरापासून तीन किलोमीटर दूर असल्याने सर्वसामान्य लोकांना पायपीट करावी लागते. किंवा रिक्षाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तालुक्यातील अनेक गावांत सध्या पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याने अनेक गावांचे सरपंच , सदस्य व नागरिक पंचायत समितीला कामानिमित्त भेटी देतात. कार्यालयात गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा कर्मचारी, बांधकाम व आस्थापना कर्मचारी, रोहयोसारख्या महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी नेहमी गैरहजर असतात.बुधवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी उपसभापती कल्याण खरात, दक्षता समितीचे अध्यक्ष अशोक वायाळ, पंजाब बोराडे , नागेश कुलकर्णी, सरपंच रामप्रसाद सुरनर, राम चव्हाण यांच्या उपस्थितीत कर्मचारी गैरहजर आढळल्याने कुलूप ठोकण्यात आले.यानंतर प्रभारी नायब तहसीलदार किशोर तायडे, तलाठी जी.आर. कुटे यांना बोलावून पंचासमक्ष कर्मचारी अनुपस्थित असल्याचा पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यामध्ये ४२ कर्मचा-यांपैकी ३४ कर्मचारी गैरहजर होते, तर १३ कंत्राटी कर्मचा-यांपैकी १० कर्मचारी गैरहजर होते. एकूण ५५ पैकी ४४ कर्मचारी गैरहजर आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या गैरहजर कर्मचा-यांवर काय कार्यवाही होते, याकडे मंठा वासियांचे लक्ष लागून आहे.विशेष म्हणजे यापुर्वी पंचायत समिती कार्यालयाचे तीन वेळा पंचनामे करण्यात आले. प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी गैरहजर आढळून येतात. याकडे वरिष्ठ अधिकारी वारंवार दुर्लक्ष करीत असल्यामुळे कर्मचारी आशा पंचनाम्यांना जुमानत नाहीत.पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मतदार संघातील असलेल्या या पंचायत समिती कार्यालयाचा भोंगळ कारभार सुधारणार कधी तरी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिका-यांकडून गैरहजर कर्मचा-यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष आहे.