शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

जालना जिल्ह्यात पावणेचार लाखांवर युवा मतदारांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 18:55 IST

लोकसभा निवडणुकीनंतरही निवडणूक विभागाने जिल्ह्यात विशेष नाव नोंदणी मोहीम राबविली.

ठळक मुद्दे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाभरात १३ लाख ८९ हजार ३३ मतदार होते.

जालना : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात तब्बल ३ लाख ६६ हजार ४४५ युवा मतदारांची वाढ झाली आहे. यात २ लाख १४ हजार युवक तर १ लाख ५२ हजार युवतींचा समावेश आहे. तर नुकताच राबविण्यात आलेल्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १८ हजार २१६ मतदारांची वाढ झाली आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी जोमात सुरू केली आहे. आजी-माजी मुख्यमंत्री संघटना बांधणीसाठी गावोगाव फिरत आहेत. सत्ताधारी विकास कामांचे ढोल वाजवित असून, विरोधक त्यांच्या चुकांवर बोट ठेवत समस्यांचा पाढा वाचत आहेत. मात्र, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाने मात्र, आपले मतदार नोंदणीचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाभरात १३ लाख ८९ हजार ३३ मतदार होते. निवडणूक विभागाने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत गत लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांची संख्या १५ लाख १६ हजार ४३१ वर गेली होती. यात ७ लाख ९८ हजार ७५० पुरूष तर ७ लाख १७ हजार ६८१ महिला मतदारांचा समावेश होता.

लोकसभा निवडणुकीनंतरही निवडणूक विभागाने जिल्ह्यात विशेष नाव नोंदणी मोहीम राबविली. दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नाव नोंदणीसाठी १९ हजार ६१० जणांचे अर्ज दाखल झाले होते. यात ९६१६ युवक व ९९९४ युवतींचे अर्ज आले होते. छाननीनंतर १२९४ अर्ज वगळण्यात आले. तर १८ हजार ३१६ मतदारांची नोंद झाली. यात ८ हजार ८९८ युवक तर ९ हजार ४१७ युवतींचा समावेश आहे. गत पाच वर्षात १८ ते २९ वर्षे वयोगटातील तब्बल तब्बल ३ लाख ६६ हजार ४४५ युवा मतदारांची वाढ झाली आहे. यात २ लाख १४ हजार युवक तर १ लाख ५२ हजार युवतींचा समावेश आहे. १८ व १९ वर्षे वयोगटातील ३४ हजार ४०१ तर २० ते २९ वर्षे वयोगटातील १ लाख ३९ हजार ९५१ मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण १५ लाख ५२ हजार ५९९ मतदार असून, यात ८ लाख १६ हजार २३२ पुरूष तर ७ लाख ३६ हजार ३६५ महिला मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, दुष्काळ, वाढती बेरोजगारी, उद्योग, शैक्षणिक सुविधा, आरोग्य यासह इतर योजनांची अंमलबजावणी, युवकांसमोरील प्रश्न आणि शासनाबाबत युवकांची भूमिका आगामी निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपातून समोर येणार आहे. त्यामुळे युवकांची अधिकाधिक मते आपल्याच पारड्यात पडावीत, यासाठीही राजकीय पक्ष विशेष लक्ष देत आहेत.

८० वर्षावरील ५४ हजार मतदार : मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर

जिल्ह्यात ८० वर्षावरील ५४ हजार २०५ मतदार आहेत. यात ८० ते ८९ वयोगटात ४४ हजार ७८, ९० ते ९९ वर्ष वयोगटात ८ हजार ६१८ तर ९९ वर्षाच्या वर वय असलेले ९१८ वयोवृध्द मतदारांचा समावेश आहे. या मतदारांनीही मतदान करावे, यासाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे.लवकरच मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर राबविले जाणार आहे. या शिबिरातूनही काही युवक, युवतींची नावे मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाधिक युवक, युवतींनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आता लागणार ‘ओटीपी’यापूर्वी निवडणूक विभागाच्या वेबसाईटवरील सहा नंबरचा अर्ज कोठेही भरता येत होता. अर्ज भरून युवा मतदारांना नाव नोंदणी करता येत होती. मात्र, आता या प्रक्रियेत बदल करण्यात आले असून, युवक आपल्या मोबाईलवरूनही नाव नोंदणी करू शकणार आहेत. मोबाईल क्रमांक आणि त्यावर येणारा ‘ओटीपी’ टाकल्याशिवाय नाव नोंदणीचा आॅनलाईन अर्ज उघडणार नाही, हे विशेष!

टॅग्स :JalanaजालनाVotingमतदानJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना