शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कृषी संजीवनी प्रकल्पात ३६३ गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:01 IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत जिल्ह्यातील ३६३ गावांचा समावेश करण्यात आला असून, हा प्रकल्प शेतक-यांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.

जालना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत जिल्ह्यातील ३६३ गावांचा समावेश करण्यात आला असून, हा प्रकल्प शेतक-यांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.परतूर तालुक्यातील वाटूर येथील गणेश मंगल कार्यालयात मंगळवारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी प्रकल्पाचे राज्य संचालक विकासचंद्र रस्तोगी, प्रकल्पाचे जिल्हा अधीक्षक रफीक नाईकवाडी, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, गणेशराव बोराडे, शिवदास हनवते, मदन शिंगी, गणेशराव खवणे, रामेश्वर तनपुरे, गणपतराव वारे, नाथाराव काकडे, प्रदीप ढवळे, विष्णू फुफाटे, जिजाबाई जाधव, परतूरचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी राजेश तांगडे, माहिती अधिकारी एस.के. बावस्कर आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जालना जिल्ह्यातील ३६३ गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून या प्रकल्पासाठी जवळपास चार हजार कोटी रुपये प्राप्त होणार आहे. राज्य शासनाचा एक हजार २०० कोटी रुपयांचा वाटा यात असणार आहे. सहा वर्षाच्या कालावधीमध्ये टप्प्या-टप्प्याने ही योजना राज्यभरात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात दहा गावांचे आराखडे तयार करण्यात येणार आहे. यामध्ये परतूर तालुक्यातील आंबा, खाडवीवाडी, हातडी, वाढोणा, मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव, अंभोरा जहागर, नायगाव ब्रह्म, देवगाव खवणे, जालना तालुक्यातील सेवली, सावरगाव बागडे या गावांचा समावेश आहे. प्रकल्प संचालक रस्तोगी म्हणाले की, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतक-यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी सक्षम व्हावा या दृष्टिकोनातून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यातील १५ जिल्ह्यातील पाच हजार १४२ गावांत व जालना जिल्ह्यातील ३६३ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाचा गावनिहाय सूक्ष्म आराखडा तयार करण्यात येणार असून, या कामामध्ये गावातील प्रत्येकाने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहनही रस्तोगी यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी केले. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विविध सेवाभावी संस्थांचे चेअरमन, सदस्य यांच्यासह पदाधिकारी, व अधिका-यांची उपस्थिती होती.