शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

कृषी संजीवनी प्रकल्पात ३६३ गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:01 IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत जिल्ह्यातील ३६३ गावांचा समावेश करण्यात आला असून, हा प्रकल्प शेतक-यांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.

जालना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत जिल्ह्यातील ३६३ गावांचा समावेश करण्यात आला असून, हा प्रकल्प शेतक-यांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.परतूर तालुक्यातील वाटूर येथील गणेश मंगल कार्यालयात मंगळवारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी प्रकल्पाचे राज्य संचालक विकासचंद्र रस्तोगी, प्रकल्पाचे जिल्हा अधीक्षक रफीक नाईकवाडी, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, गणेशराव बोराडे, शिवदास हनवते, मदन शिंगी, गणेशराव खवणे, रामेश्वर तनपुरे, गणपतराव वारे, नाथाराव काकडे, प्रदीप ढवळे, विष्णू फुफाटे, जिजाबाई जाधव, परतूरचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी राजेश तांगडे, माहिती अधिकारी एस.के. बावस्कर आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जालना जिल्ह्यातील ३६३ गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून या प्रकल्पासाठी जवळपास चार हजार कोटी रुपये प्राप्त होणार आहे. राज्य शासनाचा एक हजार २०० कोटी रुपयांचा वाटा यात असणार आहे. सहा वर्षाच्या कालावधीमध्ये टप्प्या-टप्प्याने ही योजना राज्यभरात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात दहा गावांचे आराखडे तयार करण्यात येणार आहे. यामध्ये परतूर तालुक्यातील आंबा, खाडवीवाडी, हातडी, वाढोणा, मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव, अंभोरा जहागर, नायगाव ब्रह्म, देवगाव खवणे, जालना तालुक्यातील सेवली, सावरगाव बागडे या गावांचा समावेश आहे. प्रकल्प संचालक रस्तोगी म्हणाले की, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतक-यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी सक्षम व्हावा या दृष्टिकोनातून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यातील १५ जिल्ह्यातील पाच हजार १४२ गावांत व जालना जिल्ह्यातील ३६३ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाचा गावनिहाय सूक्ष्म आराखडा तयार करण्यात येणार असून, या कामामध्ये गावातील प्रत्येकाने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहनही रस्तोगी यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी केले. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विविध सेवाभावी संस्थांचे चेअरमन, सदस्य यांच्यासह पदाधिकारी, व अधिका-यांची उपस्थिती होती.