शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कृषी संजीवनी प्रकल्पात ३६३ गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:01 IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत जिल्ह्यातील ३६३ गावांचा समावेश करण्यात आला असून, हा प्रकल्प शेतक-यांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.

जालना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत जिल्ह्यातील ३६३ गावांचा समावेश करण्यात आला असून, हा प्रकल्प शेतक-यांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.परतूर तालुक्यातील वाटूर येथील गणेश मंगल कार्यालयात मंगळवारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी प्रकल्पाचे राज्य संचालक विकासचंद्र रस्तोगी, प्रकल्पाचे जिल्हा अधीक्षक रफीक नाईकवाडी, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, गणेशराव बोराडे, शिवदास हनवते, मदन शिंगी, गणेशराव खवणे, रामेश्वर तनपुरे, गणपतराव वारे, नाथाराव काकडे, प्रदीप ढवळे, विष्णू फुफाटे, जिजाबाई जाधव, परतूरचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी राजेश तांगडे, माहिती अधिकारी एस.के. बावस्कर आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जालना जिल्ह्यातील ३६३ गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून या प्रकल्पासाठी जवळपास चार हजार कोटी रुपये प्राप्त होणार आहे. राज्य शासनाचा एक हजार २०० कोटी रुपयांचा वाटा यात असणार आहे. सहा वर्षाच्या कालावधीमध्ये टप्प्या-टप्प्याने ही योजना राज्यभरात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात दहा गावांचे आराखडे तयार करण्यात येणार आहे. यामध्ये परतूर तालुक्यातील आंबा, खाडवीवाडी, हातडी, वाढोणा, मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव, अंभोरा जहागर, नायगाव ब्रह्म, देवगाव खवणे, जालना तालुक्यातील सेवली, सावरगाव बागडे या गावांचा समावेश आहे. प्रकल्प संचालक रस्तोगी म्हणाले की, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतक-यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी सक्षम व्हावा या दृष्टिकोनातून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यातील १५ जिल्ह्यातील पाच हजार १४२ गावांत व जालना जिल्ह्यातील ३६३ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाचा गावनिहाय सूक्ष्म आराखडा तयार करण्यात येणार असून, या कामामध्ये गावातील प्रत्येकाने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहनही रस्तोगी यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी केले. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विविध सेवाभावी संस्थांचे चेअरमन, सदस्य यांच्यासह पदाधिकारी, व अधिका-यांची उपस्थिती होती.