शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

५८ हजार शेतकऱ्यांना ३६० कोटींचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:03 IST

जिल्ह्यात पीककर्ज वाटपाच्या कामाला आता गती आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महिन्याभरापूर्वी शंभर कोटीच्या आसपास असलेला पीककर्ज वाटपाचा आकडा आता साडेतीनशे कोटीच्यावर पोहचला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सहकारी तसेच महसूल आणि बँक यांना एकत्रित करून तालुका पातळीवर जे मेळावे दर आठवड्याला आयोजित केले आहेत, त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पीककर्ज वाटपाच्या कामाला आता गती आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महिन्याभरापूर्वी शंभर कोटीच्या आसपास असलेला पीककर्ज वाटपाचा आकडा आता साडेतीनशे कोटीच्यावर पोहचला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सहकारी तसेच महसूल आणि बँक यांना एकत्रित करून तालुका पातळीवर जे मेळावे दर आठवड्याला आयोजित केले आहेत, त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे जवळपास ९६ हजार शेतक-यांना नव्याने कर्ज मिळणार आहे. असे असतानाच पीककर्ज वाटपसाठी काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी महसूल, बँक आणि सहकार विभागाने एकत्रित येऊन जे प्रयत्न केले त्याला आता कुठे यश येत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात १० जुलैपर्यंत पीककर्जाचा आढावा घेतला असता, जवळपास ५८ हजार शेतक-यांना ३६० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. पीककर्जाचा वेळावेळी आढावा जिल्हाधिकाही घेत आहेत.जालना : बँकेतील अधिकारी, कर्मचा-यांची कसरत...एकीकडे खरीप हंगामात पीककर्ज मिळावे म्हणून शेतक-यांच्या बँकेत रांगा लागत असून, याच दरम्यान पीकविमा भरण्यासाठीची लगबग सुरू आहे. पीकविमा भरण्याची तारीख ही २४ जुलै अंतिम असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीकविमा भरण्यासाठी देखील शेतकरी बँकेत गर्दी करत आहे. या दोन्ही महत्वाच्या बाबींसाठी शेतक-यांची गर्दी होत असली तरी, बँकांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांनी नगर, नाशिक येथून अधिकारी, कर्मचा-यांना पाचारण केले असल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक इलमकर यांनी दिली.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रCrop Loanपीक कर्ज