शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

तीन महिन्यांत ३६ टक्के पाण्याचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:31 IST

जालना : गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक पाण्याचा साठा झाला होता, परंतु गत तीन महिन्यांत ...

जालना : गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक पाण्याचा साठा झाला होता, परंतु गत तीन महिन्यांत जिल्ह्यातील प्रकल्पांमधून सरासरी ३६ टक्के पाण्याचा उपसा झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६३.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

गतवर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि सरासरी दीडशे टक्क्यांहून अधिक पाऊस जिल्ह्याच्या विविध भागात झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरिप हंगाम पूर्णत: वाया गेला. नव्हे, नदीकाठच्या शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७ मध्यम व ५७ लघू प्रकल्प अशा एकूण ६४ प्रकल्पांमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा झाला होता. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरल्याने भविष्यातील पाण्याच्या टंचाईचा प्रश्नही मार्गी लागला आहे, परंतु गत तीनच महिन्यांत या प्रकल्पांमधून तब्बल ३६ टक्के पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये ७८.७३ टक्के तर लघू प्रकल्पांमध्ये ५६.८२ टक्के असा जिल्ह्यात एकूण ६३.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रकल्पनिहाय स्थिती पाहता, जिल्ह्यातील ६४ पैकी सहा प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा आहे. दोन प्रकल्पांमध्येही ० ते २५ टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा असून, हे प्रकल्पही मृतावस्थेत जाण्याच्या मार्गावर आहेत. ९ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा आहे. ३१ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये तर १६ प्रकल्पांमध्ये ७५ ते १०० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान, गत तीन महिन्यांतच ३६ टक्के पाण्याचा उपसा झाला असून, जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात ६३.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. आगामी उन्हाळ्याचा कालावधी पाहता, जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणी उपशाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ७८.७३ टक्के पाणीसाठा आहे. यात जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा प्रकल्पात ७९.६३ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्पात ८७.८९ टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ८२.१५ टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात ६४.८४ टक्के, धामना प्रकल्पात ६९.५७ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात ६८.१९ टक्के, अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ८१.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.