शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

महाकाळा, किनगाव येथे ३४ कोंबड्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:28 IST

जालना : अंबड तालुक्यातील महाकाळा येथील २० व किनगाव येथील १४ कोंबड्यांचा बुधवारी मृत्यू झाला. पशुवैद्यकीय विभागाच्या टीमने तत्काळ ...

जालना : अंबड तालुक्यातील महाकाळा येथील २० व किनगाव येथील १४ कोंबड्यांचा बुधवारी मृत्यू झाला. पशुवैद्यकीय विभागाच्या टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठिवले. तर, रोषणगाव (ता. बदनापूर) येथील कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथील २२ कोंबड्यांचा शनिवारी मृत्यू झाला होता. घटनेनंतर पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने या परिसरास भेट देऊन मयत कोंबड्यांचे सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. हे सॅम्पल भोपाळ येथील प्रयोगशाळेेकडे पाठविण्यात आले असून, अहवाल अद्याप अप्राप्त आहे. रोषणगाव येथील अहवाल अद्याप अप्राप्त असताना अंबड तालुक्यातील किनगाव येथील १४ व महाकाळा येथील २० काेंबड्यांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. घटनास्थळाला जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी.एस. कांबळे, शिवाजी कुरेवाड यांनी पथकासह भेट दिली. दोन्ही ठिकाणचे सॅम्पल पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाकाळा व किनगाव येथील एक किलोमीटर त्रिज्येचा परिसर संपर्क भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे.

मयत कोंबड्यांची माहिती द्यावी

एखाद्या ठिकाणी कोंबड्यांचा मृत्यू झाला, तर दक्षतेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक, पोल्ट्रीचालकांनी मयत कोंबड्यांची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

अशी घ्यावी दक्षता

एखादी कोंबडी किंवा पक्षी मृत आढळून आला, तर त्याच्या संपर्कात पक्षी, प्राणी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आजारी पक्ष्याचे विलगीकरण करावे व ते पक्षी इतर प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक कुक्कुटपालकाने जैवसुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी. सतर्क क्षेत्रामध्ये जिवंत वा मृत पक्षी तसेच अंडी, कोंबडी खत पक्षी, खाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणे इत्यादींची विक्री वा वाहतूक करू नये. सतर्क क्षेत्रातील पाच किलोमीटर त्रिज्येत प्रभावित पक्ष्यांच्या आजाराचे निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी विक्रीची किंमत किंवा कत्तलीची दुकाने, वाहतूक, पक्षी प्रदर्शने इत्यादी बाबी बंद राहणार आहे.