शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

३०० रोहित्रांची वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

फकिरा देशमुख भोकरदन : थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणकडून तालुक्यातील ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी ...

फकिरा देशमुख

भोकरदन : थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणकडून तालुक्यातील ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

महावितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांकडील थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात शेतकरी ग्राहकांची संख्या २५ हजार ३३० एवढी असून, एकूण थकबाकी ३२७ कोटी रुपये आहे. तालुक्यातील २ हजार ५०० रोहित्रांपैकी ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ऐन पीक शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले असताना महावितरणने वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत अत्यंत संतापाची लाट निर्माण झाली आहे. तालुक्यात मका, गहू, कांदा सिड्स, बाजरी, ज्वारी, हरबरा ही पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात आली आहेत. सदर पिके हे दाणे भरण्याच्या परिस्थितीत आहेत. नेमके अशाच परिस्थितीत महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास वाळून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारच्या या वीज बिल वसुली मोहिमेबाबत शेतकऱ्यांत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे

शासकीय योजनेनुसार शेतकऱ्यांनी अर्धे थकीत वीज बिल भरले तर अर्धे थकीत वीज बिल माफ होणार आहे. तालुक्यातील अडीच हजार राेहित्रांपैकी ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज बिल वसुलीचे तीन कोटी रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आजवर १३ लाख रूपये वसूल झाले आहेत. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन थकीत वीज बिल भरणे गरजेचे आहे.

दीपक तुरे, उप कार्यकारी अभियंता