शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कोरोना काळातही जालना बाजार समितीच्या उलाढालीत ३०० कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

जालना : राज्यातील पहिल्या पाच बाजार समितीत मोडणाऱ्या जालना बाजार समितीने कोरोना काळातही उत्कृष्ट कामगिरी करीत उलाढाल वाढविली आहे. ...

जालना : राज्यातील पहिल्या पाच बाजार समितीत मोडणाऱ्या जालना बाजार समितीने कोरोना काळातही उत्कृष्ट कामगिरी करीत उलाढाल वाढविली आहे. ही उलाढाल जवळपास ३०० कोटींनी वाढली असून, चालू आर्थिक वर्षात ही उलाढाल थेट ९०० कोटींवर पोहोचली आहे. यातून बाजार समितीस ११ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला आहे. जालना बाजार समिती ही राज्यात रोखीने व्यवहार करण्यासाठी प्रसिद्ध असून, येथील घाऊक व्यापारी हे भुसार मालाची आवक बाजार समितीत झाल्यास लगेचच त्यांचे पैसे अदा करत असल्याने येथे व्यवहाराला मोठे महत्त्व प्राप्त होते. जालन्यासह शेजारील विदर्भातूनही जालना बाजार समितीत माल विक्रीसाठी येत आहे. विशेष करून कोरोना काळात सर्वत्र भयावह चित्र असतानाही बाजार समितीचे सभापती तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी यासाठी जातीने लक्ष घालून शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना मोठी मदत केल्यानेच हे शक्य झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी सांगितले.

गेल्या आर्थिक वर्षात भुसार, शेती तसेच कृषी मालाची मोठी आवक झाली. त्यात विशेष करून सोयाबीन आणि कपाशीचा मोठा समावेश होता. जालन्यातील बाजार समितीत सोयाबीनचे दर मध्यंतरी थेट सात हजार ४०० रुपयांवर पोहोचले होते, जे की विक्रमी मानले जातात. कापूस खरेदीसाठीदेखील बाजार समितीचे सभापती खोतकर यांनी पणन महासंघाची मुदत संपल्यावरही शेततकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस शिल्लक होता. त्यासाठी जिनिंग मालकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी केला. तो साठवणुकीसाठी मोठमोठे पत्राचे शेड उभारून त्यात कापूस साठवून नंतर तो जिनिंगमध्ये गठाण तयार करण्यासाठी पाठविण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी बाजार समितीचे जे शुल्क होते, ते मिळण्यास अडचणी येत होत्या. हे शुल्क रद्द केले होते. त्याला न्यायालयात आव्हान दिल्यावर त्यात बाजार समितीचे हक्काचे शुल्क हे राज्य सरकारने त्यांना दिलेच पाहिजे असे आदेश न्यायालयाने दिल्याने ते थकलेले ४० लाख रुपये देखील लवकरच प्राप्त होतील असेही इंगळे यांनी सांगितले. बाजार समितीच्या संचालक मंडळाने कोरोना काळातही स्वत: बाजारात येऊन अडचणींची सोडवणूक केल्याने उलाढाल वाढल्याचे सांगण्यात आले.

चौकट

शेतकरी, व्यापाऱ्यांचे हित महत्त्वाचे

बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी यांना अडचण येऊ नये हा हेतू आहे. तसेच गेल्या दीड वर्षात कोरोनाचा कहर होता. अशाही स्थितीत शेतकऱ्यांनी घाम गाळून उत्पादित केलेल्या मालाची विक्री करताना त्यांना अडचण येऊ नये. तसेच व्यापाऱ्यांनाही या मालाची खरेदी करण्यासाठी मदत केली. या समन्वयामुळे जालना बाजार समितीची उलाढाल ही ९०० कोटींवर पोहोचली आहे. यातून बाजार समितीस ११ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला आहे. विविध बँकांकडून बाजार समितीने घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केल्याने बाजार समिती स्वयंपूर्ण झाली आहे.

अर्जुन खोतकर, सभापती, बाजार समिती जालना,