शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘फायरसेफ्टी ऑडिट’मध्ये २९ कार्यालये फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST

दीपक ढोले जालना : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील शासकीय कार्यालयांसह सामान्य रुग्णालय आणि प्राथमिक ...

दीपक ढोले

जालना : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील शासकीय कार्यालयांसह सामान्य रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची अग्नी सुरक्षा तपासणी (फायर सेफ्टी ऑडिट) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठित करून, फायर सेफ्टी ऑडिट सुरू करण्यात आले आहे. या समितीने आतापर्यंत जालना शहरातील २९ कार्यालयांची तपासणी केली आहे. या सर्वच कार्यालयांतील अग्निशमन यंत्रे दहा वर्षांपूर्वीची असल्याचे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यात बाल रुग्णालयात आग लागून १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याच दृष्टीने राज्य शासनाने राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांसह रुग्णालयांतील अग्नी सुरक्षा यंत्रणेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे जालन्यातही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र बिनवडे यांनी अग्नी सुरक्षा परीक्षण (फायर सेफ्टी ऑडिट) करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षा परीक्षणाचे काम करीत आहे. १५ फेब्रुवारीपासून ही समिती सर्वच कार्यालयांची तपासणी करीत आहे. या समितीने आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक, जिल्हा सामान्य रुग्णालयांसह २९ कार्यालयांची तपासणी केली आहे. दरवर्षी अग्निशमन यंत्र रीफिल करणे गरजे असते. तसेच दर तीन वर्षांनी अग्निशमन यंत्र बदलावे लागते; परंतु बहुतांश कार्यालयांतील अग्निशमन यंत्र १० वर्षांपूर्वीचे असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. ही समिती सदरील अहवाल जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगिलते.

ही आहे समिती

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या अग्नी सुरक्षा परीक्षण पथक समितीत पथक प्रमुख म्हणून औरंगाबाद येथील महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख मोहन मुंगसे, तसेच याच विभागातील प्रसाद शिंदे, जालना नगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभाग जालना येथील कनिष्ठ अभियंता व्ही.ई. शेरकर, परतूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता महिंद्रकर, सामान्य रुग्णालयाचे लेखाधिकारी चंद्रकांत मुंढे, वैद्यकीय पर्यवेक्षक एस.जे. मगर यांचा समावेश आहे.

५ मार्चपर्यंत करणार आठ तालुक्यांत पाहणी

जालना जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये, अंबड येथील एक उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालयाच्या दोन्ही इमारती, शहरातील गांधी चमन परिसरातील स्त्री रुग्णालय यांच्यासह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची अग्नी सुरक्षा तपासणी ही समिती करणार आहेत. यासाठी ५ मार्चपर्यंत कालावधी देण्यात आला आहे.

कर्मचारी अज्ञान

प्रत्येक कार्यालयात अग्निशमन यंत्र हाताळण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणदेखील दिले जाते; परंतु या समितीने केलेल्या तपासणीत एकाही कर्मचाऱ्यांना अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान नसल्याचे समोर आले आहे. समितीने आता पुन्हा या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

===Photopath===

240221\24jan_21_24022021_15.jpg

===Caption===

एका कार्यालयातील अग्निशमन यंत्राची पाहणी करताना पथक