शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जालना जिल्ह्यात जलयुक्तची २७० कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 18:49 IST

जालना जिल्ह्यातील सर्वच कामे राजकीय पक्षांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी केली असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.

ठळक मुद्देसर्वपक्षीय नेत्यांशी कंत्राटदारांचे संबंध

जालना : जिल्ह्यात युती सरकारच्या काळात पाणीटंचाई दूर करण्यासाठी जवळपास ७८२ कामे करण्यात आली असून, त्यावर २७० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. राज्यातील जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशी केली जाणार असल्याची घोषणा राज्य शासनाने केली असताना जालना जिल्ह्यातील कामांची चौकशी सध्या सुरू करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

जालना जिल्ह्यातील सर्वच कामे राजकीय पक्षांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी केली असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.  त्यामुळे चौकशीला विलंब होत असल्याची चर्चा सुरू आहे. जालना जिल्हा पूर्वीपासूनच दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील सिंचन क्षमता ही अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. ती वाढावी म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविली होती. त्यात २०१५ ते २०१९ या काळात २७० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी कामे ही निकष डावलून झाली आहेत; परंतु त्यांची चौकशी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही कामे करताना चार वर्षांत अनेक नवनवीन निकष पाळण्यासंदर्भात शासन निर्णय निघाले. त्यामुळे ही कामे करताना अधिकारी आणि कंत्राटदार चक्रावून गेले होते. अनेकांनी कामे पूर्ण केल्यावर ती नवीन निकषाप्रमाणे झाली नसल्याचे दिसून आले. आज या जलयुक्त शिवार योजनेतले ७८३ गावांमध्ये १३ हजार ६५० गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली आहेत. 

सर्वपक्षीय नेत्यांशी कंत्राटदारांचे संबंधजलयुक्त शिवाराची कामे करताना तांत्रिक निकष डावलून कामे केली आहेत. या कामांची कोट्यावधी रुपयांची बिले ही उचलण्यात आली. या कामांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांशी संबंधित कंत्राटदारांचा समावेश असल्यामुळे चाैकशी करण्याची मागणी एकाही पक्षाने केलेली नाही. यात भाजप, शिवसेना, तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित कंत्राटदारांनी  समावेश असल्याचेही यादीवरून दिसून येते. 

टॅग्स :JalanaजालनाJalyukt Shivarजलयुक्त शिवार