शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

जालना जिल्ह्यात जलयुक्तची २७० कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 18:49 IST

जालना जिल्ह्यातील सर्वच कामे राजकीय पक्षांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी केली असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.

ठळक मुद्देसर्वपक्षीय नेत्यांशी कंत्राटदारांचे संबंध

जालना : जिल्ह्यात युती सरकारच्या काळात पाणीटंचाई दूर करण्यासाठी जवळपास ७८२ कामे करण्यात आली असून, त्यावर २७० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. राज्यातील जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशी केली जाणार असल्याची घोषणा राज्य शासनाने केली असताना जालना जिल्ह्यातील कामांची चौकशी सध्या सुरू करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

जालना जिल्ह्यातील सर्वच कामे राजकीय पक्षांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी केली असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.  त्यामुळे चौकशीला विलंब होत असल्याची चर्चा सुरू आहे. जालना जिल्हा पूर्वीपासूनच दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील सिंचन क्षमता ही अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. ती वाढावी म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविली होती. त्यात २०१५ ते २०१९ या काळात २७० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी कामे ही निकष डावलून झाली आहेत; परंतु त्यांची चौकशी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही कामे करताना चार वर्षांत अनेक नवनवीन निकष पाळण्यासंदर्भात शासन निर्णय निघाले. त्यामुळे ही कामे करताना अधिकारी आणि कंत्राटदार चक्रावून गेले होते. अनेकांनी कामे पूर्ण केल्यावर ती नवीन निकषाप्रमाणे झाली नसल्याचे दिसून आले. आज या जलयुक्त शिवार योजनेतले ७८३ गावांमध्ये १३ हजार ६५० गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली आहेत. 

सर्वपक्षीय नेत्यांशी कंत्राटदारांचे संबंधजलयुक्त शिवाराची कामे करताना तांत्रिक निकष डावलून कामे केली आहेत. या कामांची कोट्यावधी रुपयांची बिले ही उचलण्यात आली. या कामांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांशी संबंधित कंत्राटदारांचा समावेश असल्यामुळे चाैकशी करण्याची मागणी एकाही पक्षाने केलेली नाही. यात भाजप, शिवसेना, तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित कंत्राटदारांनी  समावेश असल्याचेही यादीवरून दिसून येते. 

टॅग्स :JalanaजालनाJalyukt Shivarजलयुक्त शिवार