शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

१६० बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवासी मात्र बेफिकीर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:36 IST

जालना : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या जालना ...

जालना : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या जालना आगाराने जिल्ह्यातील तब्बल १६० बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले आहे. त्यामुळे या बसेस कोरोना फ्री झाल्या आहेत. मात्र, असे असले तरी बसमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी प्रशासकीय सूचनांचे उल्लंघन करत बेफिकीरपणे प्रवास करत आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव झाला आणि शहरी, ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली बससेवा बंद करण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली असली, तरी अनेक मार्गांवरील बसेस अद्यापही बंद आहेत. काही बसेस सुरू झाल्या आहेत, या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध मार्गांवर असलेल्या जिल्ह्यातील १६० बसेसचे कोटिंग पूर्ण झाले आहे.

एका एस. टी.ला वर्षातून चारवेळा होणार कोटिंग

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जालना जिल्ह्यातील बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. किमान तीन महिन्यांनी हे कोटिंग होणे गरजेचे आहे. त्यानुसार जालना विभागीय महामंडळाकडून कोटिंगचे नियोजन केले जात आहेत.

एका बसचे ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्यासाठी जवळपास सात हजार रूपयांचा खर्च आला आहे. सद्यस्थितीत वर्षातून दोनवेळा बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या सूचनेनुसार, पुढील कोटिंगबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या निर्णयामुळे मात्र प्रवाशांना कोरोनापासून दूर ठेवण्यास मदत होणार आहे.

बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूलाच बसला असल्यास

एखाद्या बाधित व्यक्तीने बसप्रवास केला तरी इतर प्रवाशांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण ॲन्टिमायक्रोबियल कोटिंगमुळे कमी होते.

बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले असले, तरी बसद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.

प्रवासी म्हणतात

आम्ही बसद्वारे नियमित प्रवास करतो. परंतु, कोरोनामुळे बस बंद झाल्या होत्या. त्यावेळी अनेक अडचणी आल्या. आता बसेस पूर्ववत होत आहेत. त्यात बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले जात असल्याने प्रवास सुरक्षित होणार आहे.

- रामेश्वर शिंदे

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अनेकजण बसने प्रवास करण्यास नकार देत होते. परंतु, आता महामंडळाने बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित झाला आहे.

- सुनील म्हस्के

आगार व्यवस्थापक म्हणतात...

कोरोनाचा संसर्ग रोखणे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्यात आले आहे. असे असले तरी प्रवाशांनी बसने प्रवास करताना शासकीय सूचनांचे पालन करावे.

- प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक