शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१६० बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवासी मात्र बेफिकीर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:36 IST

जालना : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या जालना ...

जालना : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या जालना आगाराने जिल्ह्यातील तब्बल १६० बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले आहे. त्यामुळे या बसेस कोरोना फ्री झाल्या आहेत. मात्र, असे असले तरी बसमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी प्रशासकीय सूचनांचे उल्लंघन करत बेफिकीरपणे प्रवास करत आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव झाला आणि शहरी, ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली बससेवा बंद करण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली असली, तरी अनेक मार्गांवरील बसेस अद्यापही बंद आहेत. काही बसेस सुरू झाल्या आहेत, या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध मार्गांवर असलेल्या जिल्ह्यातील १६० बसेसचे कोटिंग पूर्ण झाले आहे.

एका एस. टी.ला वर्षातून चारवेळा होणार कोटिंग

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जालना जिल्ह्यातील बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. किमान तीन महिन्यांनी हे कोटिंग होणे गरजेचे आहे. त्यानुसार जालना विभागीय महामंडळाकडून कोटिंगचे नियोजन केले जात आहेत.

एका बसचे ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्यासाठी जवळपास सात हजार रूपयांचा खर्च आला आहे. सद्यस्थितीत वर्षातून दोनवेळा बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या सूचनेनुसार, पुढील कोटिंगबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या निर्णयामुळे मात्र प्रवाशांना कोरोनापासून दूर ठेवण्यास मदत होणार आहे.

बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूलाच बसला असल्यास

एखाद्या बाधित व्यक्तीने बसप्रवास केला तरी इतर प्रवाशांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण ॲन्टिमायक्रोबियल कोटिंगमुळे कमी होते.

बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले असले, तरी बसद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.

प्रवासी म्हणतात

आम्ही बसद्वारे नियमित प्रवास करतो. परंतु, कोरोनामुळे बस बंद झाल्या होत्या. त्यावेळी अनेक अडचणी आल्या. आता बसेस पूर्ववत होत आहेत. त्यात बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले जात असल्याने प्रवास सुरक्षित होणार आहे.

- रामेश्वर शिंदे

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अनेकजण बसने प्रवास करण्यास नकार देत होते. परंतु, आता महामंडळाने बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित झाला आहे.

- सुनील म्हस्के

आगार व्यवस्थापक म्हणतात...

कोरोनाचा संसर्ग रोखणे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्यात आले आहे. असे असले तरी प्रवाशांनी बसने प्रवास करताना शासकीय सूचनांचे पालन करावे.

- प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक