शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात १५३ उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी तहसील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. सोमवारी एकूण १५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली.

जालना तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच तहसील कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक असून, मंगळवारी ११ ते ३ यावेळेतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नव्हता तर दुसऱ्या दिवशी केवळ दोन, तिसऱ्या दिवशी तब्बल १५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत १५५ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती तहसीलदार भुजबळ यांनी दिली. नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी उमेदवारांच्या शंकांचे समाधान केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून, ३१ डिसेंबर रोजी जालना शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मनुष्यबळ व्यवस्थापनचे जी. एल. सुर्वे, पी. एस. रायमल, के. के. कुलकर्णी, एस. एल. चौधरी, वाय. आर. कुलकर्णी, के. आर. डहाळे यांनी कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश पाठवले आहेत. जवळपास १,६५० कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भोकरदन येथे १५१ अर्ज दाखल

भोकरदन : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी १५१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी यांनी दिली. दिनांक २३ ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज प्रथम आॅनलाईन केल्यानंतर त्याची प्रत तहसील कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. पहिल्या दोन दिवसात एकही अर्ज दाखल झाला नाही. इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अर्ज दाखल करण्यास उशीर झाला आहे.

मंठ्यात १५५ उमेदवारी अर्ज दाखल

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी मंठा तहसील कार्यालयात १५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जारी केलेल्या निमयांचा पुरता फज्जा उडाला होता.

दिनांक २३ डिसेंबरपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु, २३ आणि २४ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. त्यानंतर तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी उमेदवारांनी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. सोमवारी १५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने ग्रामीण भागात आता या निवडणुकीचे वातावरण तापत आहे. राजकीय नेत्यांनीही बैठका सुरू केल्या आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी तहसील प्रशासनाने १५ टेबलची व्यवस्था केली होती. यासाठी ५० कर्मचारी कार्यरत होते तर ४ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.

अंबड येथे ८० अर्ज दाखल

अंबड : तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, आतापर्यंत ८० उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिली. शहरातील महामार्गाचे काम सुरू असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सोमवारी इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरताना विविध अडचणींचा सामना करावा लागला.