शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

जालन्यात १५३ उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी तहसील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. सोमवारी एकूण १५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली.

जालना तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच तहसील कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक असून, मंगळवारी ११ ते ३ यावेळेतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नव्हता तर दुसऱ्या दिवशी केवळ दोन, तिसऱ्या दिवशी तब्बल १५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत १५५ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती तहसीलदार भुजबळ यांनी दिली. नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी उमेदवारांच्या शंकांचे समाधान केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून, ३१ डिसेंबर रोजी जालना शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मनुष्यबळ व्यवस्थापनचे जी. एल. सुर्वे, पी. एस. रायमल, के. के. कुलकर्णी, एस. एल. चौधरी, वाय. आर. कुलकर्णी, के. आर. डहाळे यांनी कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश पाठवले आहेत. जवळपास १,६५० कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भोकरदन येथे १५१ अर्ज दाखल

भोकरदन : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी १५१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी यांनी दिली. दिनांक २३ ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज प्रथम आॅनलाईन केल्यानंतर त्याची प्रत तहसील कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. पहिल्या दोन दिवसात एकही अर्ज दाखल झाला नाही. इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अर्ज दाखल करण्यास उशीर झाला आहे.

मंठ्यात १५५ उमेदवारी अर्ज दाखल

मंठा : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी मंठा तहसील कार्यालयात १५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जारी केलेल्या निमयांचा पुरता फज्जा उडाला होता.

दिनांक २३ डिसेंबरपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु, २३ आणि २४ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. त्यानंतर तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी उमेदवारांनी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. सोमवारी १५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने ग्रामीण भागात आता या निवडणुकीचे वातावरण तापत आहे. राजकीय नेत्यांनीही बैठका सुरू केल्या आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी तहसील प्रशासनाने १५ टेबलची व्यवस्था केली होती. यासाठी ५० कर्मचारी कार्यरत होते तर ४ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.

अंबड येथे ८० अर्ज दाखल

अंबड : तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, आतापर्यंत ८० उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिली. शहरातील महामार्गाचे काम सुरू असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सोमवारी इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरताना विविध अडचणींचा सामना करावा लागला.