शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

एस.टी.त १५ टक्के उपस्थितीत कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST

कोरोनाने एस.टी.ची चाके थांबली आहेत. आधीच खासगी वाहतूक, अवैध वाहतुकीने एस.टी.चे कंबरडे मोडले आहे. त्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून म्हणजेच ...

कोरोनाने एस.टी.ची चाके थांबली आहेत. आधीच खासगी वाहतूक, अवैध वाहतुकीने एस.टी.चे कंबरडे मोडले आहे. त्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून म्हणजेच गेल्या वर्षीपासून एस.टी.च्या उत्पन्नाला ग्रहण लागले आहे. एप्रिल महिन्याचा पगार कसा करावा, हा मोठा प्रश्न व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे. एकीकडे काेरोना आणि दुसरीकडे एस.टी.ची चाके रुतल्याने हे महामंडळ प्रचंड अडचणीत सापडले आहे. त्यातच निमसरकारी मंडळ असल्याने वेतनाची हमी शासन पातळीवरून घेतली जात नसल्याने आणखी चिंता वाढली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यास मेकॅनिकल विभागातील कुशल कामगारांना बोलावेच लागत आहे. १५ टक्के उपस्थितीचा नियम हा केवळ कार्यालयीन कामकाजासाठी पाळला जात असल्याचे एस.टी.तील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

चालक-वाहकांसह १०० टक्के कर्मचारी गैरहजर

जालना विभागात जवळपास २३० एस.टी.च्या बस आहेत. पैकी केवळ एकच बस, तीदेखील जालना ते औरंगाबाद सुरू आहे. याचा मोठा फटका एस.टी. महामंडळाला बसला असून, दररोजचे नुकसान हे सरासरी २२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

चालक-वाहकांच्या प्रतिक्रिया

जालना येथील आगारात चालक म्हणून आपण गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो. कोरोनाने आमचे सर्व वैभव हिरावले आहे. ऐन लग्नसराईच्या काळात एस.टी. ठप्प होणे ही चांगले नाही.

- दादाराव ढेकळे, चालक

जालना येथील आगारात आपण गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहोत. परंतु अशी अवस्था कधीच पाहिली नव्हती. आज एस.टी.चे चाक फिरले तरच आमचा पगार होतो. आता स्थिती आणखी गंभीर झाली आहे. - विजय देशपांडे, वाहक

जालना जिल्ह्यात एकूण चार आगार आहेत. त्यांतील जालना आगार हे सर्वांत महत्त्वाचे असून, येथे येणाऱ्या जाणाऱ्या एस.टीं.ची संख्या ही लक्षणीय आहे. परंतु कोरोनाने आमचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने आम्ही सर्वजण चिंतेत आहोत. हा कोरोना कहर कधी संपतो त्याकडे लक्ष लागून आहे.

- प्रमोद नेव्हूल, विभागीय नियंत्रक