शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

एरंडीच्या बिया खाल्ल्याने १४ विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:42 IST

तालुक्यातील बठाण येथे शाळेच्या परिसरात असलेल्या एरंडी बिया खाल्ल्याने १४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील बठाण येथे शाळेच्या परिसरात असलेल्या एरंडी बिया खाल्ल्याने १४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. मुलांना तातडीने जालना येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. यात १२ मुले आणि २ मुलींचा समावेश आहे. सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी सांगितले.चैतन्य गणेश देवडे (८), पृथ्वीराज वसंत बांदल (८), भक्ती सोपान देवडे (९), गोपाल परमेश्वर देवडे (८), ओंकार प्रधान देवडे (८), प्रतिक रामनाथ देवडे (८), कृष्णा विष्णू बागल (९), दीपक भरत बागल (९), अनिकेत अर्जुन बागल (९), भारती राजेंद्र शिरसाठ (९), प्रशांत राजेंद्र शिरसाठ (६), ओमप्रकाश ऋषिधर पाटेकर (८), ओंकार दत्तात्रय वीर (८), जीवन जनार्दन उजाड (९) अशी विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्वजण जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. दुपारी सुटी झाल्यानंतर त्यांनी परिसरात असलेल्या एरंडीच्या बिया खाल्या. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उलट्याा आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. शिक्षक आणि परिसरातील ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने विद्यार्थ्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड यांनी तात्त्काळ उपचार सुरु केले. काही वेळानंतर सगळ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रूग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या.