शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

निवडणुकीसाठी १,२२५ उमेदवार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST

पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात छाननी प्रक्रियेत १ हजार २२५ उमेदवार पात्र ठरले. तर ३५ ...

पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात छाननी प्रक्रियेत १ हजार २२५ उमेदवार पात्र ठरले. तर ३५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी (२३ डिसेंबर) रोजी एकही उमेदवाराचे नामनिर्देशन अर्ज आले नव्हते. हे चित्र २४ डिसेंबर रोजीही होते. तर २८ डिसेंबरला ५३ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरले. २९ डिसेंबर रोजी ३१८, ३० डिसेंबर १ हजार २५१ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरले होते. एकूण १ हजार ६२२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज आले होते. छाननीच्या दिवशी १ हजार २८५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. दरम्यान विविध त्रुटींअभावी ३५ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. यात बोधलापुरी १, बोडखा १, रवना १, मांदळा ४, पारडगाव ३, शिंदे वडगाव ४, घोनसी तांडा २, आवलगाव बुद्रूक १, जाम समर्थ २, कंडारी अंबड ४, गुंज बुद्रूक १, खालापुरी २, यावल पिंपरी तांडा १, सरपगव्हाण १, खडकवाडी १, खडका १, घोंसी खुर्द १, बहिरेगाव १, माहेर जवळा १, बोरगाव खुर्द १, निपाणी पिंपळगाव १ या गावाचा समावेश आहे.

अर्ज माघार घेण्याकडे लक्ष

ज्या उमेदवारांना निवडणुकीतून अर्ज मागे घ्यायचा आहे, त्यांना ४ जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे कोण अर्ज मागे घेणार आणि कुणाला कोणते चिन्ह मिळणार याबाबत मतदारांमधून उत्सुकता वाढली आहे.